शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

लूट थांबविण्यासाठी शेतकरी व्हायला हवा व्यापारी

By नामदेव मोरे | Updated: July 29, 2024 10:39 IST

ग्राहक संघ व गटांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करण्याची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.

नामदेव मोरे, उपमुख्य उपसंपादक

कृषी व्यापारात मध्यस्थांच्या वाढलेल्या साखळीमुळे शेतकरी व ग्राहक दोघांचीही पिळवणूक होत आहे. साखळी तोडण्यासाठी शासकीय धोरणांची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. पिळवणूक थांबविण्यासाठी शेतकरी व्यापारी झाला पाहिजे. पिकवणाऱ्याला विकता आले पाहिजे. दुसरीकडे, ग्राहक जागा झाला पाहिजे. ग्राहक संघ व गटांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करण्याची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना विकता आले पाहिजे

शेतकरी भाजीपाल्याची लागवड करण्यापासून ते प्रत्यक्ष भाजीपाला काढेपर्यंत दोन ते चार महिने दिवसरात्र मेहनत करतात; पण मालाची काढणी झाली की त्याची थेट ग्राहकाऐवजी मध्यस्थाला विक्री करतात. यामुळे शेतकऱ्यांना २५ रुपये किलो भाव मिळाला तर ग्राहकांना त्यासाठी १२५ रुपये मोजावे लागतात. शेतकऱ्यांनी स्वत: किंवा शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतकरी आठवडी बाजार, बाजार समिती, गृहनिर्माण सोसायट्या, कारखाने, कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर मालाची विक्री केली तर त्यांना जास्त लाभ होऊ शकतो. शेतकरी स्वत: व्यापारी झाला तर मध्यस्थांची साखळी तोडणे शक्य होऊ शकते. शेतकऱ्यांना मालाची विक्री करण्यासाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.

मध्यस्थांची अमर्याद साखळी

खेडेगावातील शेतकऱ्यांच्या मालाचे संकलन तेथील एखादी मध्यस्थ करतो. तो माल स्थानिक बाजार समितीमध्ये विक्री केला जातो. तेथून व्यापारी तो मुंबई बाजार समितीमध्ये पाठवितात. बाजार समितीमधून किरकोळ विक्रेता व काही वेळा मोठ्या किरकोळ विक्रेत्यांकडून पदपथावरील विक्रेत्याकडे व नंतर ग्राहकाकडे जातो. शेतकरी ते ग्राहक यांच्यामध्ये चार ते पाच मध्यस्थ, तीन वेळा वाहतूक खर्च व तीन वेळा चढ-उतार करण्याची मजुरी द्यावी लागते. यामुळे शेतकऱ्याला मिळणाऱ्या मालापेक्षा ग्राहकाला चार ते पाचपट किंमत मोजावी लागते.

हापूससह फुल शेतकऱ्यांचा प्रयत्न

दसरा व दिवाळीमध्ये झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असते. पूर्वी शेतकरी होलसेल व्यापाऱ्यांकडे फुले पाठवायचे; पण योग्य भाव मिळायचा नाही. मागील काही वर्षांत शेतकरी स्वत:च नवी मुंबई, मुंबईमध्ये येऊन फुलांची विक्री करतात. यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो व ग्राहकांना स्वस्त फुले मिळतात. कोकणातील आंबा उत्पादकही आता आंबा महोत्सवासह थेट विक्रीची साखळी तयार करत असून, बाजार समितीला पर्यायी यंत्रणा उभी करू लागले असून, या आंबाविक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हीच यंत्रणा भाजीपाल्यासाठी सुरू व्हावी.

धोरणांची हवी अंमलबजावणी

मध्यस्थांची साखळी तोडण्यासाठी शासनाने २००६ मध्ये मॉडेल ॲक्ट मंजूर केला. २०१६ मध्ये भाजीपाला नियमनमुक्त केला. थेट पणनची योजना सुरू केली. शेतकरी आठवडी बाजार सुरू केले. या चारही योजना मध्यस्थांची साखळी तोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात; पण त्याची योग्य अंमलबजावणीच होत नाही. थेट पणनचा दुरुपयोग सुरू आहे. दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. ‘शेतकरी बाजार’ची संख्या वाढत नाही.

ग्राहक जागा झाला पाहिजे

मुंबईतील ग्राहक चळवळ मृतावस्थेकडे चालली आहे. शेतकऱ्यांनी थेट विक्रीसाठी त्यांचे गट तयार केले पाहिजेत. त्याच धर्तीवर ग्राहकांनी थेट शेतकऱ्यांकडून खरेदीसाठी गट तयार करून घाऊक खरेदी केली पाहिजे. सोसायटीनिहाय, काॅर्पोरेट कंपनी, शासकीय कार्यालयनिहाय गट तयार झाले तरी कमी दरात भाजीपाला खरेदी करणे थेट शेतकऱ्यांना लाभ मिळवून देता येणे शक्य आहे. ग्राहक जागा झाला तरी महागाई नियंत्रणात येऊ शकेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र