शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

शेतकरी अस्थिकलश आणणाऱ्यास अटक

By admin | Published: May 22, 2017 12:41 AM

शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी अस्थिकलश घेऊन आलेले शेतकरी विजय जाधव यांच्या अटकेचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी अस्थिकलश घेऊन आलेले शेतकरी विजय जाधव यांच्या अटकेचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. शेतकरी मंत्र्यांना भेटूच शकणार नाहीत, असे धोरण तरी ठरवा असा टोला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाला हाणला. या अटक प्रकरणी चौकशीची मागणी शिवसेनेने केली. कर्जबाजारीपणामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, सांगली जिल्ह्यातील २५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अस्थींचा कलश घेऊन वाळवा तालुक्यातील विजय जाधव हे कर्जमाफीसाठी मोटारसायकलवरून महाराष्ट्रभरात फिरत आहेत. शेतकरी वाचवा, कर्जमाफी करा, या मागणीसाठी त्यांनी अनके लोकप्रतिनिधींची भेट घेतली पण त्यांना कोणी दाद दिली नाही. शनिवारी जाधव हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत आले होते. मंत्रालयासमोरील आकाशवाणी येथील आमदार निवासात ते थांबले होते. मात्र रात्री २.३०च्या सुमारास त्यांना नरिमन पॉइंट पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सकाळी त्यांना आझाद मैदानात सोडण्यात आले. यासंदर्भात शिवसेनेचे मुंबईतील आमदार अजय चौधरी यांनी आज विधानसभेत आवाज उठविला.जाधव यांच्यावरील पोलीस कारवाईची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी त्यांना पाठिंबा दिला. ‘या प्रकरणी चौकशी करून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात निवेदन केले जाईल, असे सांसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. गृहराज्यमंत्री भेटलेशिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, आ.अजय चौधरी, राजन साळवी आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आझाद मैदान येथे आंदोलन करणारे जाधव यांची भेट घेऊन विचारपूस केली. दुपारी गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी जाधव यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करा आदी मागण्या जाधव यांनी केल्या.