शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

शेतकऱ्यांनाही मिळणार सेवेची हमी

By admin | Published: July 20, 2015 1:06 AM

बियाण्याचे तसेच माती व पाणी नमुना तपासणी, निर्यात कृषिमालास फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देणे आदी प्रकारच्या १५ सेवा शासनाने निश्चित केलेल्या वेळेत पुरवण्याचे

पुणे : बियाण्याचे तसेच माती व पाणी नमुना तपासणी, निर्यात कृषिमालास फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देणे आदी प्रकारच्या १५ सेवा शासनाने निश्चित केलेल्या वेळेत पुरवण्याचे बंधन सेवाहमी कायद्याअंतर्गत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना घालण्यात आले आहे. शेतकऱ्यांना या सेवा पुरविण्यास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात दाद मागता येईल, असे राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी नुकत्याच काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क विधेयक मंजूर केले. या कायद्यामुळे नागरिकांना शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत सेवा मिळण्याचा अधिकार मिळाला असून, संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत काम पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वेळेत सेवा न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर या कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.शासनाने कायदा लागू केल्यानंतर प्रत्येक सरकारी कार्यालयांना पहिल्या टप्प्यात किमान १५ सेवांची हमी देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार राज्याच्या कृषी आयुक्तांनी गुरुवारी याबाबत स्वतंत्र अधिसूचना काढून राज्यातील शेतकऱ्यांना किमान १ सेवा ठरवून दिलेल्या वेळेत देण्याची हमी दिली आहे. यासाठी प्रत्येक संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्याने वेळेत सेवा न पुरवल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर देखील ही सेवा वेळेत मिळाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर सेवा हमी कायद्याअतंर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे.