शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

शेतकऱ्यांना कर्जमुक्त, जीएसटीमुक्त करणार: राहुल गांधी, भारत जोडो न्याय यात्रेत आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 06:03 IST

देशात आपले सरकार आल्यास राज्यातील महाविकास आघाडी असो अथवा राजधानी दिल्लीतील सरकार असो, शेतकऱ्यांसाठी सदैव दरवाजे खुले राहतील, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : बड्या उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाते मग, या शेतकऱ्यांचे कर्ज माफ का होऊ शकत नाही, असा प्रश्न करीत केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येईल, या देशात प्रथमच शेतकऱ्यांना जीएसटीच्या माध्यमातून कर लागू करण्यात आला आहे, तो काढून शेतकरी करमुक्त करण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांनी दिले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त गुरुवारी नाशिक जिल्ह्यातील चांदवड बाजार समिती येथे सभेत ते बोलत होते. 

शेतकऱ्यांसाठी सदैव दारे उघडी ठेवणार

- शेतकऱ्यांच्या समस्यांवर चार मात्रा सांगत राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना उत्तर दिले. 

- याशिवाय देशात आपले सरकार आल्यास राज्यातील महाविकास आघाडी असो अथवा राजधानी दिल्लीतील सरकार असो, शेतकऱ्यांसाठी सदैव दरवाजे खुले राहतील, असे सांगितले.

अन्य मुद्दे पुढे आणून दिशाभूल केली जातेय

या यात्रेत महाविकास आघाडीचे नेते म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. देशात महागाई, बेरोजगारी, भागीदारी, धर्म आणि शेतकरी अशा अनेकांच्या समस्या असल्या तरी प्रत्यक्षात त्याकडे दुर्लक्ष केले असून, राम मंदिर किंवा अन्य मुद्दे पुढे आणून दिशाभूल केली जाते, असे सांगून देशातील धनाढ्य उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करणाऱ्या भाजप सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन देऊन देखील तशी कृती केली नाही, याचा पुनरुच्चार करून त्यांनी शेतकरी समस्याग्रस्त असून, त्यांच्या समस्यांवर उपचार म्हणून केवळ एक मात्रा चालणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, देशात जीएसटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर प्रथमच लागू करण्यात आलेला कर मागे घेण्यात येईल. हमीभाव देणे कायद्याने शक्य नाही, असे सरकारकडून सांगितले जाते. मात्र, या आयोगांच्या शिफारशीनुसार किमान आधारभूत किंमत देण्यात येईल, असे ते म्हणाले.   

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीNashikनाशिकcongressकाँग्रेस