शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
2
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
3
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
4
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
5
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
6
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
7
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
8
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
9
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
10
एका महिन्यात 30 लाख नवीन ग्राहक! BSNL ची कमाल;  Airtel, Vodafone आणि Jio ची  अवस्था वाईट!
11
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
12
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
13
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
14
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
15
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
16
'या' भाषा भारतात सर्वाधिक बोलल्या जातात; तुम्हाला माहितीये का?
17
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
18
जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुजय विखेंचे ढोंग...
19
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे
20
"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"

शेतीमाल थेट ग्राहकांच्या दारात

By admin | Published: May 23, 2016 5:22 AM

शेतकऱ्यांना बाजार समिती कायद्याच्या जाचातून मुक्त करत शेतमाल थेट ग्राहकांच्या दारात विकण्याची परवानगी देणारा विनियमनमुक्ती अध्यादेश आठवडाभरात निघणार आहे.

गौरीशंकर घाळे, मुंबई शेतकऱ्यांना बाजार समिती कायद्याच्या जाचातून मुक्त करत शेतमाल थेट ग्राहकांच्या दारात विकण्याची परवानगी देणारा विनियमनमुक्ती अध्यादेश आठवडाभरात निघणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पणन विभागातील उच्च अधिका-यासमवेत झालेल्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब असा निर्णय घेतल्याचे समजते. या निर्णयामुळे कधीकाळी अस्तित्वात असलेला रयतु बाजार पुन्हा बहरणार असून शेतमालाला योग्य भाव आणि व्यापाऱ्यांची साखळी दूर झाल्याने ग्राहकांना रास्त दरात फळे व भाजीपाला उपलब्ध होतील.एपीएमसी कायद्यानुसार सध्या शेतकऱ्यांना आपला भाजीपाला तसेच फळे, कांदे-बटाटे आदी शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत विकावा लागतो. शेतकरी ते ग्राहक यांच्यात दलाल, व्यापारी व बाजार समित्या अशी साखळी असल्याने शेतकऱ्यांची अडवणूक आणि अडत आणि अन्य करांमुळे आर्थिक पिळवणूक होते. परिणामी, शेतमालाचा योग्य भाव मिळत नाही. तर, दुसरीकडे मधल्या साखळीमुळे ग्राहकांना तोच माल चढ्या दराने विकत घ्यावा लागतो. त्यामुळे खरेदी-विक्रीत पारदर्शी कारभार आणण्यासाठी नियमनमुक्ती करण्याची मागणी होत होती. अलीकडेच मुख्यमंत्री, पणनमंत्री आणि पणन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमनमुक्तीबाबत सविस्तर चर्चा केली असून येत्या आठवड्यात तसा अध्यादेश निघण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात एपीएमसी कायद्यात सुधारणा करण्याची तयारी सरकारने चालविली आहे. सरकारच्या या निर्णयास व्यापारी वर्गाकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही व्यापारी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधामुळे सरकारला हा निर्णय पुढे ढकलावा लागला होता. देशातील ८ राज्यांनी नियमनमुक्तीचे धोरण स्वीकारले. शेतकरी आणि ग्राहकांच्या हितासाठी महाराष्ट्रानेही नियमनमुक्ती करावी, यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर महिन्यात राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र धाडले होते. मात्र, दलालांच्या दबावामुळे केवळ बैठकांचेच सत्र चालले. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय अत्यावश्यक असून लवकरच त्याबाबत अध्यादेश काढण्याचे संकेत स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनीही दिले होते. बाजार समित्यांना चाप नव्या अध्यादेशानंतर केवळ धान्य आणिं मसाल्यांचे पदार्थच बाजार समित्यांमध्ये आणणे बंधनकारक राहणार आहे. फळे, भाजीपाला, कांदे-बटाटे नियमनमुक्त झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा आर्थिक कणाच मोडणार आहे. यूपीए सरकारच्या काळात झालेली भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही काही शेतमाल नियमनमुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र व्यापारी व दलालांच्या दबावामुळे त्यावर अंमलबजावणी होऊ शकली नव्हती.