शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

दुष्काळाची भीती कायम

By admin | Published: September 22, 2015 2:16 AM

राज्यातील दुष्काळी भागात गेले काही दिवस समाधानकारक पाऊस झाला असला तरी दुष्काळाची भीती अद्याप पूर्णपणे गेलेली नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले.

मुंबई : राज्यातील दुष्काळी भागात गेले काही दिवस समाधानकारक पाऊस झाला असला तरी दुष्काळाची भीती अद्याप पूर्णपणे गेलेली नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते. धरणांमधील वाढलेला पाणीसाठा आणि टँकर व चारा छावण्यांची घटलेली संख्या या बाबी दिलासा देणाऱ्या असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आज दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील तसेच सोलापूर, सांगली, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदतीचे वाटप करावे, वन हक्क कायद्याअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर शेतकऱ्याचे नाव नोंदवावे, असे निर्देश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी या वेळी दिले. पिकांचे ३३ टक्के वा त्यापेक्षा जास्त नुकसान झाल्यास टंचाई जाहीर करण्याचे धोरण आहे. हे लक्षात घेता आजही हजारो गावे टंचाईच्या टप्प्यात आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत त्याबाबत आढावा घेण्यात येईल. केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठविला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.परतीच्या पावसामुळे रब्बी पिकाच्या पेरण्या ७० लाख हेक्टरपर्यंत होतील, असा अंदाज आहे. जलयुक्त शिवार योजनेला या पावसाचा फायदा झाला आहे. सध्याच्या पावसाने बहुतांश जिल्ह्यांत जूनपर्यंत पुरेल इतका जलसाठा निर्माण झाला आहे; तर अवर्षणग्रस्त भागातील स्थितीत सुधारणा झाली असून, या भागातही मार्चपर्यंत पाणीटंचाई भेडसावणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात १४ सप्टेंबर रोजी एकूण १९९० टँकरद्वारे १५१५ गावे आणि ३२२७ वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, आज ११९० टँकरद्वारे ९०८ गावे आणि १८४२ वाड्यांवर पाणी पुरविले जात असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)