शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सीएए, एनआरसीवरून आदिवासी, दुर्बलांच्या मनात भीती- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 06:50 IST

‘माझे सरकार त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे’

मुंबई : आपण जर प्रमाणपत्रे, कागदपत्रे पुरवू शकलो नाही तर आपल्याला मिळणा-या सोयीसुविधा तर जातीलच पण आपले स्वातंत्रयही हिरावून घेतले जाईल, अशी भीती सीएए,एनआरसी, एनपीआर यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आदिवासी, दुर्बल वंचित घटक यांच्या मनात दिसत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले. मात्र, भीती वाटण्याचे कारण नाही आपले सरकार या समाजांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असे ते म्हणाले.राज्पपालांनी मराठीतून अभिभाषण दिले या बद्दल अभिनंदन करून मुख्यमंत्री म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राचे यंदाचे साठावे म्हणजे हीरकमहोत्सवी वर्ष आहे.संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा राज्याचा हिरकमहोत्स्व साजरा करण्यात येणार आहे.विरोधी पक्षानेही यासाठी सरकारला साथ दयावी असे आवाहन त्यांनी केले. विरोधी पक्षाने महाविकास आघाडीच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कारकिर्दीत अतिशय उत्तम सहकार्य केले आहे.पुढची पाच-पन्नास वर्षे असेच सहकार्य आम्हाला मिळत राहील असा टोलाही मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी भाजपला हाणला.कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रातील मराठी बांधव हा देखील हिंदूच आहे. सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न असूनही आजही या मराठी बांधवांवर अत्याचार होत आहेत. महाविकास आघाडी सरकार हे स्थगिती सरकार असल्याची करण्यात येणारी ओरड खोटी आहे. कोणत्याही विकासकामांना आम्ही स्थगिती दिलेली नाही.आम्ही विकासाचे मारेकरी नाही. सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक कामांना स्थगिती देण्यात आली आहे.आपल्याकडे त्याची कागदपत्रे असल्याचे म्हटले.मंत्री धनंजय मुंडे यांनी मुनगंटीवार यांच्या म्हणण्यावर आक्षेप घेतला. तेव्हा हवे तर यावर आपण हक्कभंग टाकतो असे मुनगंटीवार म्हणाले. मुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप करत सुधीरभाऊ हक्कभंग जरूर टाका पण आधी हक्क समजून घ्या.मी स्थगिती दिलेली नाही तर केवळ प्राधान्यक्रम ठरविला असल्याचे आधीच स्पष्ट केल्याचे सांगितले.मुख्यमंत्री कार्यालय आता तालुक्यापर्यंतसर्वसामान्य जनतेला छोटया छोटया कामांसाठी मंत्रालयाचे हेलपाटे घालावे लागू नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला.आता याचा विस्तार तालुका पातळीवरही करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.मुंबईत रंगभूमीचे दालन उभारणारसमाजाच्या जडणघडणीत मराठी रंगभूमीचे योगदान मोठे आहे.याच रंगभूमीचा इतिहास उलगडून सांगण्यासाठी मुंबईत रंगभूमीचे दालन उभारण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNational Register of Citizensएनआरसीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक