शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

वसंताच्या आगमनाचा रंगला फुलोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2017 1:19 AM

‘पळसाला पाने तीनच’ या म्हणीमुळे प्रसिद्ध झालेले पळसाचे झाड सध्या पाच पाकळ्यांच्या लालकेशरी भडक रंगाच्या फुलांनी भरले आहे.

नीलेश काण्णव,भीमाशंकर- ‘पळसाला पाने तीनच’ या म्हणीमुळे प्रसिद्ध झालेले पळसाचे झाड सध्या पाच पाकळ्यांच्या लालकेशरी भडक रंगाच्या फुलांनी भरले आहे. पोपटाच्या चोचीप्रमाणे असणारी ही फुले लांबून पाहिली असता जंगलातून लाल ज्वाला बाहेर येत असल्याचा भास होतो.शिशिराची गळती संपून वसंत पालवी झाडांना फुटू लागली आहे. वसंताच्या आगमनाबरोबर झाडांवर रंगीबेरंगी फुलांनी उधळण सुरू झाली आहे. कोकिळेची कुहूकुहू, पक्षांचा किलबिलाट, मधमाश्यांची गुणगुण याने आसमंत घुमू लागला आहे. पळस, काटेसावर, पांगारा, करपा अशा विविध फुलांनी डोंगरदऱ्या रंगून गेल्या आहेत. त्यात बहुउपयोगी असलेला पळस सर्वांचे लक्ष वेधून घेतो. पळसाच्या पानाच्या पत्रावळी बनवतात, पळसाची वाळलेली फुले पाण्यात भिजून उतरलेला रंग कपडे रंगवण्यासाठी वापरतात, सालीचा उपयोग कातडी कमावण्यासाठी करतात, बियांचे तेलही काढतात.पळसाबरोबरच लालभडक काटेसावरीची फुले जंगलात प्रत्येकाचे लक्ष आकर्षित करून घेत आहेत. सावरीच्या झाडाची पाने गळल्यानंतर टपोऱ्या कळ््या तयार होतात व याचे रूपांतर हाताच्या विताएवढ्या आकाराच्या फुलांमध्ये होते. या फुलांच्या तळाशी भरपूर पुष्परस असतो. त्यामुळे पक्षी, कीटक, मधमाश्या या झाडाला झोंबलेले असतात. फुले ताजी असतानाच खाली गळून पडतात व गळलेली फुले जंगली प्राणी खातात. फुले गळल्यानंतर बोंडे तयार होतात. हिरवी बोंडे तपकिरी होऊन उकलतात व त्यातून पांढरा कापूस निघतो. हा कापूस वाऱ्यावर उडताना ‘हिमवृष्टी’ होत असल्याचा भास होतो. पांगारा झाडाचा डेरेदार वृक्ष फुललेला असताना सगळ््यांचे लक्ष वेधून घेतो. पूर्ण फुलांनी भरलेले हे झाड जंगलामध्ये लांबून ज्वाळांचा भास देणारे, रंग भरणारे वाटते. उभ्या तिरप्या काटेरी फांद्यांवर खालून वर उमलत गेलेले दोन ते तीन फुलांचे गुच्छ लागलेले असतात. या फुलांमध्ये पाणी भरलेले असते व हे पाणी पक्षी उन्हाळ््यात पिण्यासाठी वापरतात. फुलांचा बहर संपत आल्यावर शेंगा येतात. सह्याद्रीच्या पर्वतरांगा अशा विविध फुलांनी रंगून गेल्या आहेत. शहराबाहेर पडल्यानंतर काही ठिकाणी हे वृक्ष दिसतात; परंतु याचे खरे सौंदर्य पाहण्यासाठी जंगलाकडेच जावे लागते.