शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

कृषी संशोधनामध्ये देश जगाच्या मागे - मोदींनी व्यक्त केली खंत

By admin | Published: November 13, 2016 7:55 PM

कृषी संशोधनामध्ये भारत जगाच्या खूप मागे आहे. त्यामध्ये जितके संशोधन व्हायला हवे होते, तंत्रज्ञान प्रगत व्हायला हवे होते तितके झाले नाही, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 13 - कृषी संशोधनामध्ये भारत जगाच्या खूप मागे आहे. त्यामध्ये जितके संशोधन व्हायला हवे होते, तंत्रज्ञान प्रगत व्हायला हवे होते तितके झाले नाही,  अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली.
मांजरी येथील वसंतदादा इन्स्टिट्यूट येथे आयोजित शुगरकेन परिषदेच्या उद्घाटनानंतर उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी हे मत व्यक्त केले.  पंतप्रधान म्हणाले, "कृषी संशोधनामध्ये भारत जगाच्या खूप मागे आहे. त्यामध्ये जितके संशोधन व्हायला हवे होते, तंत्रज्ञान प्रगत व्हायला हवे होते तितके झाले नाही. आज शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचा पोत स्वत: तपासला पाहिजे. कृषीविद्यापीठांमधून तसेच जास्तीत जास्त लांब उसकाडी कशी तयार होईल यासाठी संशोधन व्हायला हवे."
पंतप्रधान पुढे म्हणाले, "खाडीऐवजी झाडीच्या तेलाला महत्त्व देण्याची गरज आहे. त्यासाठी इथेनालच्या उत्पादनाकडेही लक्ष द्यायला हवे. ब्राझीलने इथेनॉला चांगला उपयोग करत आहे. भारतातही इथेनालची निर्मिती आणि वापर वाढविला पाहिजे. इथेनॉल बनविण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत."
यावेळी नोटबंदीवर भाष्य करताना पंतप्रधानांनी बनावट नोटांचा खेळ परकीय देश खेळतात. नक्षलवाद, दहशतवादाची मुळे छाटण्याची आवश्यकता होती. शेती उत्पादनाला कर लागेल हा विनाकारण भ्रम पसरविला जात आहे, मात्र असे काहीही होणार नाही, असेही सांगितले.  "५०० व १००० च्या सध्याच्या नोटांचे मूल्य १४ लाख कोटी इतके आहे. तरुण पिढीच्या भवितव्यासाठी या चलनातून बाद करणे आवश्यक होते. ७० वर्षाच्या आजारपणातून सुटका करण्यासाठी हे पाऊल गरजेचे होते. १००० च्या बदल्यात प्रत्येकाला १००० रुपयेच मिळतील, एक रुपयाही कमी देणार नाही. नोटांची व्यवस्था यापूर्वी करता आली असती मात्र त्यामुळे ही बातमी फुटण्याचा धोका होता. मला केवळ ३० डिसेंबर पर्यन्त ५० दिवसांची मुदत द्या, सर्व सुरळीत होईल, असे पंतप्रधान म्हणाले.