शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

‘पाण्यासाठी अवमान याचिका दाखल करणार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2016 3:54 AM

पाण्याचा हक्क हा जगण्याच्या मूलभूत हक्कात अंतर्भूत असून, १५ फेब्रुवारी २०१५पर्यंत मुंबईतील सर्वांनी पाणीपुरवठा करणाऱ्या धोरणाचा प्रस्ताव

मुंबई : पाण्याचा हक्क हा जगण्याच्या मूलभूत हक्कात अंतर्भूत असून, १५ फेब्रुवारी २०१५पर्यंत मुंबईतील सर्वांनी पाणीपुरवठा करणाऱ्या धोरणाचा प्रस्ताव देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिले होते. मात्र, महापालिकेकडून आदेशाचे उल्लंघन झाले असून, त्याविरोधात न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय याचिकाकर्त्या पाणी हक्क समितीने घेतला आहे. मुंबईतील गरीब वस्त्यांतून राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पाणी मिळावे, म्हणून समितीने २०११ साली याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने ज्या नागरिकांची घरे अनधिकृत असतील, त्यांनाही पाण्याची जोडणी मिळणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले होते. शिवाय सर्वांना पाणी उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असून, त्यानुसार महापालिकेने १५ फेब्रुवारी २०१५ च्या आत पाणीपुरवठा धोरणाचा प्रस्ताव देण्याचे आदेश दिले.न्यायालयाच्या आदेशावर पालिका आयुक्तांनी पाणीपुरवठा धोरणाचा मसुदा स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर केल्याची माहिती समितीचे सीताराम शेलार यांनी दिली. ते म्हणाले की, ‘स्थायी समितीने संबंधित मसुदा फेटाळत आयुक्तांकडे फेरविचारासाठी पाठवला होता. पालिकेच्या या निर्णयामुळे कोर्टाचा व घटनेचा अवमान करण्यात आला आहे.’ (प्रतिनिधी)