शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

आंबेत बौद्धवाडीला जोडणारा साकव मोजतोय शेवटची घटका

By admin | Published: June 05, 2017 2:59 AM

जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधण्यात आलेल्या आंबेत मोहल्ला व बौद्धवाडीला जोडणारा साकव पूल शेवटची घटका मोजत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसळा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर. अंतुले यांच्या गावामध्ये त्यांच्याच कारकिर्दीत जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधण्यात आलेल्या आंबेत मोहल्ला व बौद्धवाडीला जोडणारा साकव पूल शेवटची घटका मोजत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष न दिल्यास येथील नागरिकांचा येत्या पावसाळ्यामध्ये संपर्क तुटण्याची शक्यात वर्तविली जात आहे. तब्बल ३५ वर्षांपूर्वी ८०च्या दशकात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॅ.ए.आर. अंतुले असताना, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत आंबेत बौद्धवाडीला जोडणाऱ्या साकव पुलाचे काम झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मागील वर्षी आलेल्या मुसळधार पावसामध्ये या पुलाच्या मधला भाग व पिलर तुटला होता. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायत सरपंच सरस्वती आंबेकर, ग्रामसेवक राहुल घोडके व ग्रामस्थांनी तक्र ारदेखील केली होती. साकव पुलाला तुटून एक वर्ष होत आले, तरी वरिष्ठांकडून दुरु स्तीसाठी कोणत्याही प्रकारची दखल अद्याप घेतली नसल्याचे समजते. आंबेत मोहल्ल्यात रोजगारासाठी घरकाम करणाऱ्या महिला व मजुरीसाठी जाणारे नागरिक तसेच आता शाळांची घंटा पुन्हा वाजणार असून, विद्यार्थ्यांनाही याच पुलाचा वापर करून आपला जीव मुठीत घेऊन साकव पार करावा लागत आहे. या साकवाची एवढी दुरवस्था झाली आहे की तो कधीही कोसळेल अशी परिस्थिती आहे. या साकवाच्या पिलरला हि तडे गेले आहेत. पावसाळ्यात हा साकव पूल कोसळून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्यास त्याला बांधकाम विभाग पूणपणे जबाबदार राहील आणि संबंधितांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आंबेत बौद्धवाडीला जोडणाऱ्या या साकवची दुरुस्ती व्हावी या मागणीसाठी आंबेत बौद्धजन मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांना देखील निवेदन देण्यात आले आहे.