शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

वंचित शेतकऱ्यांना आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2015 2:16 AM

राज्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात बाधित झालेले काही शेतकरी तांत्रिक कारणामुळे मदतीपासून वंचित राहिले होते. अशा शेतकऱ्यांचे बँक खाते उघडल्यानंतर

मुंबई : राज्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात बाधित झालेले काही शेतकरी तांत्रिक कारणामुळे मदतीपासून वंचित राहिले होते. अशा शेतकऱ्यांचे बँक खाते उघडल्यानंतर त्यात मदतीची रक्कम जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, ४०२.७३ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात बाधित झालेल्या शेतकऱ्यांपैकी ८० टक्के शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले होते. उर्वरित २० टक्के शेतकऱ्यांना तांत्रिक कारणामुळे (उदा. बँक खाते उपलब्ध नसणे) मदतीचे वाटप होऊ शकले नाही. आता या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा केली जाणार आहे. २०१४मधील खरीप हंगामामध्ये अपुऱ्या पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले होते. ५० पैशांपैक्षा कमी पैसेवारी आलेल्या बाधित शेतकऱ्यांना ४ हजार कोटी रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले होते. यापैकी काही निधी तांत्रिक कारणामुळे गेल्या आर्थिक वर्षात वितरित होऊ शकला नव्हता. आता शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार नाशिक विभागास २.५५ कोटी रुपये, औरंगाबाद विभागास ३५२.२४ कोटी रुपये तर अमरावती विभागास ४७.९४ कोटी रुपये अशी एकूण ४०२.७३ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे.