शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

सामाजिक आणि आर्थिक विकासाची संधी शोधणार

By admin | Published: September 18, 2016 3:43 AM

जहाज वाहतूक क्षेत्रात मोठी संधी आहे. समुद्री मार्गे होणारी मालवाहतूक देशाच्या आर्थिक विकासात भर घालू शकते.

मुंबई : जहाज वाहतूक क्षेत्रात मोठी संधी आहे. समुद्री मार्गे होणारी मालवाहतूक देशाच्या आर्थिक विकासात भर घालू शकते. देशाच्या जलवाहतुकीत ४ टक्क्यांनी वाढ झाली असून, येत्या दोन वर्षांत देशातील बंदरांची क्षमता १६५ मेट्रीक टन वाढण्याची आशा आहे. आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असून, मागणी आणि पुरवठ्यातील तफावत कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेएनपीटी ९० टक्क्यांहून अधिक क्षमतेने काम करत असून, येथे व्यापाराला प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण झाले पाहिजे. मरिन ड्राइव्ह येथे ‘जेट्टी वॉटर स्पोर्ट्स’ उभारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, येत्या दोन महिन्यांत हा विषय मार्गी लागेल. कुलाबा ससून डॉकच्या स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येत असून, येथे अत्याधुनिक मच्छी मार्केट उभारण्यात येईल. रस्त्यांच्या चौपदरीकरणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असून, सामाजिक आणि आर्थिक विकासाची संधी यातून शोधली पाहिजे, असे म्हणणे तज्ज्ञांनी मांडले.>राज्यातल्या पायाभूत सुविधांची सद्य:स्थिती व भविष्यातील नियोजनाचा आढावा घेणाऱ्या ह्यलोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्हह्ण अंतर्गत ह्यबंदरे आणि जहाज वाहतूक : बंदर जोडणी योजना, देशांतर्गत जलमार्ग, बंदर औद्योगिकीकरण आणि सागरमालाह्ण या विषयांवर, बंदर विकास सादरीकरणात येस बँकेचे विनोद बहेती, मुंबई पोर्ट ट्रस्टचे संजय भाटिया, केंद्र सरकारचे प्रतिनिधी आर. के. अगरवाल, इनलॅन्ड वॉटरवेजचे प्रवीर पांडे आणि जेएनपीटीचे नीरज बन्सल यांनी आपआपली मते मांडली.विनोद बहेती यांनी बंदर आणि जलप्रकल्पांविषयीचे सादरीकरण केले. ते म्हणाले, देशाला जहाज वाहतूक क्षेत्रात मोठी संधी आहे. समुद्रामार्गे होणारी मालवाहतूक देशाच्या आर्थिक विकासात भर घालू शकते. देशात १२ मोठी बंदरे आहेत. शिवाय सुमारे १८० लहान बंदरे आहेत. देशाला ७ हजार ५०० किलोमीटरपेक्षा लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. देशाला लाभलेल्या भौगोलिक परिस्थितीचा आपण फायदा घेतला पाहिजे. सागरमाला हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, त्यासोबतच राष्ट्रीय जलमार्ग प्रकल्पही तेवढाच महत्त्वाचा आहे. देशाच्या जलवाहतुकीत ४ टक्क्यांनी वाढ झाली असून, येत्या दोन वर्षांत देशातील बंदरांची क्षमता १६५ मेट्रीक टन वाढण्याची आशा आहे. मोठ्या बंदरांसह छोट्या बंदरांची क्षमताही वाढेल; मात्र याकरिता छोट्या बंदरांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी सरकारने पुढाकार घेणे गरजेचे आहे.नीरज बन्सल यांनी जेएनपीटी हे देशातील मोठे बंदर असल्याचे सांगत या बंदराची क्षमता दुप्पट होण्याच्या मार्गावर असल्याचे नमूद केले. बंदरातील वाहतुकी अंतर्गत आयात-निर्यात वाढविण्यावर भर देण्यात येत असून, बंदरावरील वाढता ताण कमी करण्याकडे लक्ष देण्यात येत आहे. शिवाय जलवाहतुकीच्या दृष्टीकोनातून परवाने कसे सुटसुटीत करता येतील? याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असून, पायाभूत सेवा-सुविधा वाढविण्यावर भर दिला पाहिजे. कंटेनर वाहतुकीचा विचार करता याबाबत थोड्याफार समस्या असल्या तरीदेखील त्याही सोडविल्या पाहिजेत. आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असून, मागणी आणि पुरवठ्यातील तफावत कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेएनपीटी ९० टक्क्यांहून अधिक क्षमतेने काम करीत असून, येथे व्यापाराला प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण झाले पाहिजे. जलवाहतुकीबाबत राज्याचे धोरण चांगले असले तरीदेखील यात बदलही अपेक्षित आहेत. एकंदर जलवाहतूक क्षेत्रात निर्माण झालेली दरी भरून काढण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकारने केले पाहिजे.संजय भाटिया यांनी मागील दोन वर्षांत जलवाहतुकीत मोठे बदल झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, आपण आपली उत्पादन क्षमता वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मागील दोन वर्षांत उल्लेखनीय बदल झाले आहेत. आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीचा विचार करता जलवाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा प्रयत्न आहे. ई-बिझनेस वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट हे आपले ह्यहोम पोर्टह्ण असून, मालवाहतुकीत सातत्य ठेवण्यात येईल. मालवाहतुकीसह प्रवासी वाहतुकीवर भर देण्यात येणार आहे. पूर्व दिशेकडील बंदरांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, काही प्रमाणात जागेचा प्रश्न भेडसावत आहे. मात्र हा प्रश्नही निकाली काढण्यात येईल. प्रवासी वाहतुकीचा विचार करताना पायाभूत सेवासुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. मरिन ड्राइव्ह येथे ह्यजेट्टी वॉटर स्पोर्ट्सह्ण उभारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, येत्या दोन महिन्यांत हा विषय मार्गी लागेल. कुलाबा ससून डॉकच्या स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येत असून, येथे अत्याधुनिक मच्छी मार्केट उभारण्यात येईल. आर. के. अगरवाल यांनी औद्योगिकीकरणाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, औद्योगिकीकरणाचा विचार करता देशातील बंदरे एकमेकांना जोडण्यावर भर देण्यात येत आहे. बंदरांलगत औद्योगिकीकरण महत्त्वाचे असून, बंदरांचा अधिकाधिक अभ्यास करत या क्षेत्रात संशोधनाची आवश्यकता आहे.प्रवीर पांडे यांनी बंदरांच्या विकासामुळे आर्थिक स्थैर्य येण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. नॅशनल वॉटर वे, नवी बंदरे आणि रस्ते वाहतुकीत सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगितले; शिवाय गंगा आणि ब्रह्मपुत्रासारख्या नद्यांतून पावसाळा वगळता उर्वरित महिने जलवाहतूक वाढविण्यावर भर दिला पाहिजे, असेही मत मांडत हे आव्हानात्मक असल्याचे सांगितले. शिवाय जेव्हा आपण कोळशासारखे घटक आयात करतो; तेव्हा ते घटक कुठे उतरवायचे? हा प्रश्न मोठा असतो. हा प्रश्न सोडविण्यावर भर दिला पाहिजे. रस्त्यांच्या चौपदरीकरणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असून, सामाजिक आणि आर्थिक विकासाची संधी यातून शोधली पाहिजे. आणि सागरी वाहतुकीद्वारे अधिकाधिक लक्ष मालवाहतुकीकडे केंद्रित करण्याची गरज आहे.>रस्ते, रेल्वेचे जाळे पसरणारचर्चासत्राचे सूत्रसंचालन ‘सीएनबीसी टीव्ही १८’चे प्रशांत नायर यांनी केले. या वेळी नायर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी समर्पक उत्तरे दिली.प्रशांत नायर : अत्याधुनिक तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष होत आहे का?प्रवीर पांडे : पायाभूत सेवा-सुविधा आपण देत आहोत. मात्र हे प्रमाण कमी आहे. जलवाहतुकीचा विचार करता पायाभूत सेवासुविधांकडे अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे; शिवाय पायाभूत सेवा-सुविधा उभारताना त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे महत्त्वाचे आहे.प्रशांत नायर : प्रवासी वाहतुकीबाबत काय सांगाल?प्रवीर पांडे : जमुना विकास प्रकल्पाला जागतिक बँकेने मदत केली आहे. प्रवासी वाहतुकीसाठीही जागतिक बँक मदत करण्यास तयार आहे. इतर काही नवे जलप्रकल्प असून, त्यांचा अभ्यास सुरू आहे.प्रशांत नायर : रोड आणि रस्ते वाहतुकीबाबत काय सांगाल?आर. के. अगरवाल : रेल्वे जाळे आणि रस्त्यांच्या जाळ्यांवर आम्ही भर देत आहोत. शेवटी जलवाहतूक समृद्ध करायची म्हटले तरी रेल्वे आणि रस्त्यांच्या विकासावर भर देणे तेवढेच गरजेचे आहे.