शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

नद्या स्वच्छ करण्यासाठी पर्याय शोधा

By admin | Published: September 23, 2016 4:41 AM

बई महापालिका, एमएमआरडीए नद्यांच्या स्वच्छतेबाबत काहीच पाऊल उचलत नसल्याने मुंबईतील नद्यांची दैना झाली आहे.

मुंबई : मुंबई महापालिका, एमएमआरडीए नद्यांच्या स्वच्छतेबाबत काहीच पाऊल उचलत नसल्याने मुंबईतील नद्यांची दैना झाली आहे. नद्यांमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडल्याने व त्यामध्ये कचरा टाकल्याने रोगांना आमंत्रण देण्यात येत आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने महापालिका व एमएमआरडीएला नद्या स्वच्छ करण्यासाठी तत्काळ पर्याय शोधण्याची सूचना केली.प्रत्येक वर्षी मुंबईच्या रस्त्यांवर पाणी तुंबत असल्याने व तुंबलेल्या पाण्याचा निचरा लवकर होत नसल्याने महापालिका, एमएमआरडीए आणि राज्य सरकारला यावर उपाय शोधण्याचे व प्रतिबंधक उपाययोजना आखण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी व्यवसायाने वकील असलेले अटल दुबे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे केली आहे. जुलै २००५ च्या महाप्रलयानंतर महापालिकेने मिठी नदीचा गाळ व नदीतील दगड बाहेर काढण्याचे काम हाती घेतले. मात्र नॅशनल एनव्हायर्नमेंटल इजिनियरींग रिसर्च इन्स्टिट्युटने (नीरी) मिठीबद्दल सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे, की दरदिवशी मिठीमध्ये कितीतरी टन कचरा टाकण्यात येतो. मिठी नदीची खोली १६ फुट आहे. मात्र आता ती सात फुटही नाही, अशी माहिती यचिकाकर्त्यांचे वकील एस. सी. नायडू यांनी उच्च न्यायालयाला दिली. ‘ही अत्यंत धोकायदायक परिस्थिती आहे. हे जर खरे असेल तर सर्व संबंधित प्रशासनांनी अधिकारक्षेत्रावरून वाद न घालता तत्काळ बैठक घेऊन पर्याय शोधावा. हा चिंतेचा विषय आहे,’ असे न्या. व्ही. एम. कानडे व न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने म्हटले. ‘संबंधित प्रशासन आपले कर्तव्य पार पाडत नसल्याने मुंबईतील नद्यांची दैना झाली आहे. नद्यांमध्ये कचरा टाकल्याने मुंबईत पाणी साठते आणि त्यामुळे चिकनगुनिया, डेंग्यु यांसारखे साथीचे आजार पसरत आहेत,’ असेही निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. नद्या स्वच्छ करण्यासाठी तातडीने उपाययोजना आखा, अशी सूचना उच्च न्यायायालयाने महापालिका व एमएमआरडीएला करत नीरीने केलेल्या शिफारशींवर विचार करून युद्धपातळीवर त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही दिले. (प्रतिनिधी)