शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

बॉटूलिझम विषबाधेवर उपाय सापडेना

By admin | Published: February 09, 2016 2:12 AM

साकडबाव पठारावर शेतीउपयोगी ३० जनावरे बॉटूलिझम विषबाधेने मृत पावल्याने शेतकरी चिंतेत असून त्यांचा व्यवसाय संकटात सापडला आहे. या विषबाधेवर रामबाण उपाय सापडत नसल्याने

- रवींद्र सोनावळे , शेणवासाकडबाव पठारावर शेतीउपयोगी ३० जनावरे बॉटूलिझम विषबाधेने मृत पावल्याने शेतकरी चिंतेत असून त्यांचा व्यवसाय संकटात सापडला आहे. या विषबाधेवर रामबाण उपाय सापडत नसल्याने पशुधन अधिकारी हताश झाले आहेत.शहापूर तालुक्यातील साकडबाव पठारावर सलग तिसऱ्या वर्षी बॉटूलिझम विषबाधेने थैमान घातले आहे. जनावरांमध्ये क्षरांची कमतरता, पुरेसा खुराक नसणे, मयत जनावरे उघड्यावर टाकणे, कुजलेल्या हाडातील व पालापाचोळ्यातील बॉटूलिझम विष मोकाट जनावरांनी खाणे, कुजलेले आंबे खाणे, पुरेसे पोटभर पाणी न मिळणे, ही या विषबाधेची मूळ कारणे असून गुरांचे पायबळ जाणे, ताकद कमी होणे, शेपटी लुळी पडणे, चालता न येणे, उठता न येणे, भूक मंदावणे, लाळ सांडणे, अंग गार पडणे, पाय व शेपटीला सुई टोचल्यास वेदना न होणे, ही विषबाधेची लक्षणे आहेत. या विषबाधेने २०१३-१४ मध्ये चिलरवाडीतील ८८ जनावरे मृत पावली होती. संबंधित शेतकऱ्यांना आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत न्युकलियास बजेटमधून बैल- सात हजार, गाय- पाच हजार व वासरू- दोन हजार याप्रमाणे अर्थसाहाय्य केले होते. तसेच २०१४-१५ साली चिंद्याचीवाडी येथील ४० जनावरे मृत पावली आहेत. त्यांना अजूनही भरपाई मिळाली नसून १५ डिसेंबर २०१५ ते ७ फेब्रुवारी २०१६ या दोन महिन्यांत लाख्याचीवाडी, मधलीवाडी व रानविहीर येथील यशवंत लाखे ९, विठ्ठल लाखे ५, मंगल भामरे ४, संजय भारमर १, मनोहर लाखे १ , नवसू भगत २, सुभाष शिरकंडे २, तुकाराम बरतड १, विठ्ठल मुंढे १, हिरामण लाखे २, जयराम मेंगाल १, शंकर भगत १ या १२ आदिवासी शेतकऱ्यांची ३० जनावरे मृत पावली आहेत. यातील १६ जनावरांचे पोस्टमार्टम करून त्यांचे नमुने चौकशीसाठी पुणे येथील पशुरोग अन्वेषण विभागाकडे पाठविले आहेत. या प्रकारच्या विषबाधेवर कोणतीही लस अथवा औषधोपचार उपलब्ध नसल्याने उपचाराविना लागण झालेली जनावरे १२ तासांच्या आत मृत पावतात. - डॉ .ए.पी. पाटील, पशुधन विकास अधिकारी, पं.स. शहापूर