शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

अग्निशमन केंद्रांना टाळे?

By admin | Published: June 05, 2017 3:25 AM

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाची ‘ड’ प्रभाग आणि ‘ह’ प्रभाग कार्यालयांतील केंद्रे अपुऱ्या मनुष्यबळाअभावी बंद करण्यात येणार आहेत.

प्रशांत माने । लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाची ‘ड’ प्रभाग आणि ‘ह’ प्रभाग कार्यालयांतील केंद्रे अपुऱ्या मनुष्यबळाअभावी बंद करण्यात येणार आहेत. अग्निशमन दलानेही त्याला दुजोरा दिला आहे. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ही केंद्रे चालवणे जिकिरीचे झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांची समस्या अन्य विभागांप्रमाणे अतिमहत्त्वाच्या अशा अग्निशमन दलासाठीही डोकेदुखी ठरत आहे. केडीएमसीच्या अग्निशमन दलासाठी अधिकारी आणि कर्मचारी, अशा मिळून २२८ पदांना सरकारची मान्यता आहे. फायरमनची १५० पदे मंजूर असताना प्रत्यक्षात केवळ ६५ कर्मचारीच कार्यरत आहेत. ड्रायव्हर-कम-आॅपरेटरची ३० पदे मंजूर असताना सध्या १० कर्मचारीच कार्यरत आहेत. लिडिंग फायरमनच्या ३० पदांना मान्यता आहे, पण सध्या १३ जणच या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे एखादी मोठी घटना तसेच आपत्ती ओढवल्यास उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून सेवा पुरवणे तारेवरची कसरत ठरते. केडीएमसीच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दोन वर्षे भरती प्रक्रिया सुरू होती. त्यात ४५ पदांकरिता परीक्षाही घेण्यात आली. तसेच निकालही जाहीर करण्यात आला. परंतु, पुढे त्याची कोणतीही प्रक्रिया पार पडलेली नाही. सध्या चार अग्निशमन केंद्रे कार्यरत आहेत. कल्याण-डोंबिवली शहरांतील लोकसंख्येच्या तुलनेत आठ केंद्रांची आवश्यकता आहे. परंतु, उपलब्ध कर्मचारी बळ आणि सामान्य प्रशासन विभागाचे भरती करण्याकडे होत असलेले दुर्लक्ष पाहता चारपैकी दोन केंद्रे बंद करण्याची वेळ संबंधित विभागावर ओढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. २६ जुलै २००५ च्या प्रलयंकारी महापुराच्या वेळी ओढवलेल्या परिस्थितीवरून डोंबिवली पश्चिमेकडील ‘ह’ प्रभागात, तर कल्याण पूर्वेकडील ‘ड’ प्रभागात नागरिकांच्या सोयीसाठी अग्निशमन केंद्रे सुरू करण्यात आली. परंतु, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे या केंद्रांवर आता गंडांतर येण्याची दाट शक्यता आहे. डोंबिवली एमआयडीसी आणि कल्याणमधील आधारवाडी ही दोनच प्रमुख केंद्रे चालू ठेवण्याची भूमिका अग्निशमन विभागाने घेतली आहे. त्याबाबत, सामान्य प्रशासन विभागाला सांगण्यात आले आहे. यावर, प्रशासन कोणता निर्णय घेते,याकडे लक्ष लागले आहे. >नव्या केंद्रात होणाऱ्या स्थलांतराला ब्रेकडोंबिवली पश्चिमेतील ‘ह’ प्रभाग कार्यालयातील अग्निशमन केंद्राला १० ते १२ वर्षे झाली आहेत. या कार्यालयानजीकच्या श्रीधर म्हात्रे चौकात नवीन वास्तू उभारण्यात आली आहे. परंतु, केंद्राच्या स्थलांतराला अद्यापपर्यंत मुहूर्त मिळालेला नाही. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सध्या केंद्र चालवणे जिकिरीचे झाल्याने नवीन जागेत केंद्र स्थलांतर करून कर्मचारी आणायचे तरी कोठून, असा यक्षप्रश्न अग्निशमन विभागाला पडल्याने स्थलांतराला तूर्तास ब्रेक लागल्याची चर्चा आहे.