शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

वक्तृत्व स्पर्धेत कल्याणच्या श्रद्धा वझे प्रथम

By admin | Published: April 27, 2016 3:53 AM

साने गुरु जी वाचनालयाने घेतलेल्या वकृत्त्व स्पर्धेत यंदाची दुष्काळी परिस्थिती पाहता आपल्या स्पर्धकांनी वकृत्त्वातूनदेखील याच विषयावर भाष्य करणे पसंत केले

ठाणे : साने गुरु जी वाचनालयाने घेतलेल्या वकृत्त्व स्पर्धेत यंदाची दुष्काळी परिस्थिती पाहता आपल्या स्पर्धकांनी वकृत्त्वातूनदेखील याच विषयावर भाष्य करणे पसंत केले. या स्पर्धेत कल्याणच्या श्रद्धा वझे यांनी बाजी मारली. नेरळच्या दर्पण गाडे यांनी द्वितीय, खारीगावच्या गणेश बिडये यांनी तृतीय क्रमांक पटकाविला तर उत्तेजनार्थ म्हणून कमलाकर गुर्जर व उषा साठे यांची निवड झाली. परिक्षक म्हणून कवी नारायण लाळे यांनी काम पाहिले. या स्पर्धेसाठी ‘दुष्काळ मानव निर्मित की निसर्ग निर्मित’, ‘इंग्रजी माध्यम आणि डिजिटायझेनचा वाचनालयांवर परिणाम होईल का?’, सन २०१५ मध्ये प्रकाशित झालेले आणि मला आवडलेले पुस्तक आदी विषय दिले होते. स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी आपला उत्स्फुर्त प्रतिसाद दर्शविला. दुष्काळासाठी माणूस जबाबदार आहे. पूर्वी पूर्ण चार महिने पाऊस पडायचा. आता हे प्रमाणात व्यस्त आणि अनियमति झाले आहे. मध्येच अवकाळी पाऊस येतो. पाणी अडवा पाणी जिरवा, पाण्याचे नियोजन , सिंचन प्रकल्पांची कल्पकता दाखिवली नाही. वृक्षांची बेसुमार कत्तल, जमिनीची प्रचंड धूप, पाणी वापराबाबतचा बेफिकीरपणा अशा अनेक कारणांमुळे दुष्काळ परत परत येत आहे. भविष्यात पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होईल. हे भीषण संकट दूर करायचे असेल तर नियोजन आताच केले पाहिजे. प्रत्येकाने सहकार्य आणि शिस्त दाखिवली पाहिजे अशी विविध मते या विषयावर स्पर्धकांनी व्यक्त केली. पहिला दुष्काळ इ.पू, ६४६ साली रोममध्ये पडला होता. त्यानंतर इ,स. ६४२ मध्ये इजिप्तमध्ये पडल्याचीही माहिती दिली. राजेंद्रसिंह यांनी राजस्थानात केलेली जलक्र ांती, पोपटराव पवार,अण्णा हजारे यांनी केलेले शिवारातीला प्रयोग, यांचा आदर्श समोर ठेवून नियोजन करण्यात प्रत्येकाने सहभाग दिला पाहिजे अशी उपाययोजनाही या स्पर्धेतून सुचविण्यात आली. (प्रतिनिधी)