शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

वाशिममध्ये होणार पहिले अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन

By admin | Published: January 29, 2016 1:58 AM

तब्बल २३ राज्यांमध्ये बंजारा समाजाची लोकसंख्या आहे. बंजारा संस्कृती संपन्न असली, तरी ती अलिखित स्वरुपात आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील बंजारा साहित्याचे संकलन करण्यासाठी

यवतमाळ : तब्बल २३ राज्यांमध्ये बंजारा समाजाची लोकसंख्या आहे. बंजारा संस्कृती संपन्न असली, तरी ती अलिखित स्वरुपात आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील बंजारा साहित्याचे संकलन करण्यासाठी पहिल्यांदाच अखिल भारतीय स्तरावरचे बंजारा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. बंजारा समाजाची काशी पोहरादेवी ज्या जिल्ह्यात आहे, त्या वाशीममध्ये हे साहित्य संमेलन होणार आहे.येत्या ६ आणि ७ फेब्रुवारीला अखिल भारतीय गोरबंजारा साहित्य संमेलन होत असल्याची माहिती रविवारी यवतमाळात पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गबरूसिंग राठोड (औरंगाबाद), आॅल इंडिया बंजारा सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड, प्रा. डॉ. विजय जाधव उपस्थित होते.डॉ. टी. सी. राठोड म्हणाले, बंजारा तांड्यांची अवस्था आजही भकास आहे. त्यांच्यापर्यंत नव्या परिवर्तनाचे वारे पोहोचविण्यासाठी हे संमेलन घेण्यात येत आहे. समाजाचा इतिहास केवळ मौखिक रूपात आहे. तो शब्दबद्ध करण्याच्या दृष्टीनेही यातून प्रयत्न होणार आहेत. नव्या पिढीला परिवर्तनवादी विचार कळावे, त्यांनी ते आचरणात आणून समाज पुढे न्यावा, यासाठी साहित्य संमेलनातून प्रयत्न केले जाणार आहेत. तर संमेलनाध्यक्ष गबरूसिंग राठोड म्हणाले, स्वातंत्र्यानंतर बंजारा समाजातील शिक्षित तरुणांना साहित्य कळू लागले. काही चांगले लेखकही तयार होत आहेत. परिवर्तनवादी विचारही मांडत आहेत. मात्र, हे सर्व शहरीवर्गापुरतेच मर्यादित आहे. आता हा परिवर्तनाचा विचार खेड्यांपर्यंत, तांड्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. त्यासाठीच संपूर्ण भारतातील बंजारा लेखकांना, साहित्यिकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. संपूर्णपणे बंजारा बोलीतून होणारे हे संमेलन निश्चितच आगळे-वेगळे ठरणार आहे. (प्रतिनिधी)संमेलनाध्यक्षपदी प्राचार्य गबरुसिंग राठोडऔरंगाबाद तालुक्यातील कचनेर येथील साहित्यिक प्राचार्य गबरुसिंग राठोड हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. १९६९ ते २००३ पर्यंत मुख्याध्यापक व प्राचार्य राहिलेले गबरुसिंग राठोड यांची आत्तापर्यंत २५ पुस्तके आणि दीडशेवर लेख प्रकाशित झाले आहेत. फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीत कार्यकर्ते असलेले प्राचार्य राठोड हे अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अ.भा. सत्यशोधक समाज, सत्यशोधक ओबीसी परिषद, बामसेफमध्ये सक्रिय आहेत.