शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

By admin | Published: August 12, 2014 2:43 AM

गेल्या वर्षी झालेल्या गारपिटीने डोळ्यांत पाणी आणल्यानंतर या वर्षी तरी वरुणराजाची दमदार हजेरी होईल, या आशेवर मराठवाड्यात शेतकऱ्यांनी कर्जे काढून पेरण्या केल्या़

परभणी/बीड/ नांदेड : गेल्या वर्षी झालेल्या गारपिटीने डोळ्यांत पाणी आणल्यानंतर या वर्षी तरी वरुणराजाची दमदार हजेरी होईल, या आशेवर मराठवाड्यात शेतकऱ्यांनी कर्जे काढून पेरण्या केल्या़ मात्र, पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग अधिक गडद झाले आहेत़ मराठवाड्यात पावसाअभावी येणारी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे़ गेल्या २४ तासांत परभणी, बीड जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर नांदेड जिल्ह्यात एक अशा पाच शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली़ परभणी तालुक्यातील मिरखेल येथे भोजराज भिवाजी कनकुटे (५५) यांनी सोमवारी सकाळी १० वाजता शेतातील झाडाला गळफास घेतला. नापिकी व कर्ज कसे फेडावे या नैराश्येतूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांचा मुलगा नारायण कनकुटे यांनी पोलिसांना सांगितले. दुसऱ्या घटनेत पूर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारात कैलास पांडुरंग कुऱ्हे पळसकर (३३) असे याने रविवारी रात्री गळफास घेतला. दुबार, तिबार केलेली पेरणी वाया गेल्याने कर्ज कसे फेडावे? या विवंचनेत सापडलेल्या नांदेड जिल्ह्यातील बरबडा येथील रामदास आलमकर (५५) यांनी सोमवारी विषारी द्रवप्राशन करून आत्महत्या केली. बीड जिल्ह्याच्या शिरूरकासार तालुक्यातील फुलसांगवी येथील लहू सर्जेराव गोरडे (५५) या शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली़ त्यांच्यावर सोसायटीचे कर्ज होते. तर दुसऱ्या घटनेत धारूर तालुक्याच्या बोडका येथे रामभाऊ साळुंके (५४) यांनी सोमवारी सकाळी शेतात झाडाला गळफास घेतला. त्यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला मात्र रात्री उशिरापर्यंत नोंद नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)