शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

ताडोबातील वाघोबासाठी आले ५ लाख पर्यटक

By admin | Published: January 05, 2017 9:50 PM

व्याघ्र पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला गेल्या ५ वर्षांत ५ लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 5 - व्याघ्र पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला गेल्या ५ वर्षांत ५ लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. यातून १४ कोटींहून अधिकचा महसूल प्राप्त झाला. मात्र २०१६ मध्ये पर्यटकांची संख्या तुलनेने बरीच कमी दिसून आली. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत पर्यटनासंदर्भात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे विचारणा केली होती. २०१२-१३ ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीत किती पर्यटक प्रकल्पात आले, यातून किती महसूल प्राप्त झाला, किती वाघांचा मृत्यू झाला, इत्यादी प्रश्नांची त्यांनी विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार या कालावधीत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला एकूण ५ लाख ३ हजार ८३१ पर्यटकांनी भेट दिली. ९७ हजार ६०४ वाहनांतून हे पर्यटक आले होते. पर्यटनातून व्याघ्र प्रकल्पाला एकूण १४ कोटी ८७ लाख ६ हजार ९३४ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. ५ वर्षांत पर्यटकांची संख्या ५ लाखांवर गेली असली तरी २०१६ मध्ये आकडेवारी घटल्याचे दिसून आले. जानेवारी ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीत केवळ ६७ हजार ९५३ पर्यटकांनी भेट दिली व यातून २ कोटी ६० लाख ७७ हजार ९३२ रुपयांचा महसूल मिळाला. १३ वाघांचा मृत्यू२०१२ ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीत व्याघ्र प्रकल्पातील १३ वाघांचा मृत्यू झाला. यातील ९ मृत्यू नैसर्गिक होते. मात्र २ वाघांची शिकार झाली, तर २ वाघांचा अपघाती मृत्यू झाला. २०१२ व २०१५ मध्ये सर्वाधिक ४ वाघांचा मृत्यू झाला. प्राणी, पक्ष्यांची माहितीच नाहीदरम्यान, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात किती जंगली प्राणी व पक्षी आहेत याची नावासोबत संख्या उपलब्ध नाही. केवळ संकेतस्थळावर प्राणी व पक्ष्यांची सर्वसाधारण माहिती उपलब्ध आहे. सोबतच संबंधित कालावधीत किती विदेशी पर्यटकांवर कारवाई झाली, याची माहितीदेखील कार्यालयाकडे उपलब्ध नाही.