शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Flood: राज्यातील महापूर ओसरू लागला; मात्र सर्प, विंचूदंशाचा वाढला धोका! कशी घ्यावी काळजी? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 07:40 IST

सतर्क राहण्याचे सर्पमित्रांचे आवाहन, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून, पुढील काही तास तो पूर्ववत होण्याची शक्यता कमी आहे

मुंबई : मुंबईच्या आसपासच्या परिसरासह राज्यातील बहुतांश ठिकाणी विशेषत: कोकण (मुंबईसह) आणि मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. आता येथील पूर ओसरू लागले असले तरीदेखील सर्पदंशाच्या घटनांपासून नागरिकांनी सतर्क राहावे आणि सुरक्षा बाळगावी, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.

पावसामुळे रानामाळातील, डोंगरपायथ्यानजीकची सर्पांची वास्तव्याची ठिकाणे म्हणजे  बिळे, सर्पांची वारुळे, विटा-दगड-मातीचे ढिगारे, दगड-गोट्यांच्या चिरा, भिंतीमधील भेगांमध्ये सर्प, विंचू पाण्याबरोबर प्रवाहित होत पडवी, माजघर किंवा काही वेळेस स्वत:चा जीव वाचविण्यासाठी आणि भक्ष्याच्या शोधात घरात शिरतात. अशाप्रसंगी सर्पदंश, विंचूदंश टाळण्यासाठी सुरक्षेची उपाययोजना करण्यात यावी, असे सर्पमित्र भरत जोशी यांनी सांगितले. 

हे करा...

  • अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून, पुढील काही तास तो पूर्ववत होण्याची शक्यता कमी आहे. अशावेळी सोबत एक काठी आणि टॉर्च बाळगावी.
  • नेहमी चप्पल, सँडल, बूट आणि गमबुटाचा वापर करावा.
  • चटई, सतरंजी, ब्लँकेट झाडून-झटकून घ्यावे.
  • पाण्यातून, चिखलातून वावरताना हातात नेहमी काठी बाळगावी.

 

सर्पदंश झाला तर...

  • सर्पदंश झाला तर प्रथमोपचार देत संबंधिताला सरकारी ग्रामीण रुग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करावे.
  • डाव्या हाताला सर्पदंश किंवा विंचूदंश झाल्यास हाताच्या कोपरापासून खालच्या दिशेने क्रेप बँडेज बांधा.
  • सर्पदंशावर पाण्याची संततधार सोडा. हाताच्या कोपरापासून खालच्या दिशेने हाताने दाबत राहा. म्हणजे रक्ताबरोबर ५० टक्के विष आणि विषारी रक्त सर्पदंश झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून बाहेर पडेल.

 

टॅग्स :floodपूरRatnagiri Floodरत्नागिरी पूरchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाKolhapur Floodकोल्हापूर पूर