शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
6
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
7
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
8
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
9
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
10
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
11
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
12
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
13
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
14
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
15
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
16
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
19
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
20
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

विमानतळाचा मार्ग मोकळा

By admin | Published: June 27, 2014 1:21 AM

आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणा:या दहा गावांतील बहुतांशी ग्रामस्थांनी शासनाने मंजूर केलेल्या सिडकोच्या पुनर्वसन पॅकेजला मंजुरी दिली आहे.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणा:या दहा गावांतील बहुतांशी ग्रामस्थांनी शासनाने मंजूर केलेल्या सिडकोच्या पुनर्वसन पॅकेजला मंजुरी दिली आहे. त्यामुळे विमानतळाच्या उभारणीच्या मार्गातील प्रमुख अडसर दूर 
झाला आहे. त्यानुसार सिडकोने पुनर्वसनाची कार्यवाही सुरू केली असून प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणा:या 22.5 टक्के भूखंड वाटप योजनेची पहिली लॉटरी 15 ऑगस्ट रोजी काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. 
 आतार्पयत जवळपास बाधित होणा:या गावांतील जवळपास 90 टक्के घरांच्या  सव्रेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. पुनर्वसन पॅकेजला विरोध दर्शविणा:या वरचा ओवळा आणि कोली गावातील ग्रामस्थांनीही सव्रेक्षणास सहमती दर्शविली आहे. तसेच पारगाव आणि पारगांव डुंगी गावातील ग्रामस्थांनी पुनर्वसन पॅकेजला अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे उर्वरित गावांचे सव्रेक्षणही लवकरच पूर्ण केले जाईल, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी  
पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव आणि संचालक नामदेव भगत आदी   उपस्थित होते.
संपादित करण्यात येणा:या भूखंडाच्या बदल्यात नुकसान भरपाई म्हणून प्रकल्पग्रस्तांना दापोली येथील प्रस्तावित पुष्पकनगरमध्ये 22.5 टक्के विकसित भूखंड देण्यात येणार आहे. ‘प्रथम येईल  त्यास प्राधान्य’ या तत्त्वावर या भूखंड वाटप योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ 15 ऑगस्टला करण्यात येणार आहे. 22.5 टक्के भूखंडासाठी सध्या 70 ग्रामस्थांचे संमतीपत्र सिडकोला प्राप्त झाले आहे. येत्या 23 जुलैर्पयत संमतीपत्र व आवश्यक कागदपत्रे 
सादर करणा:या पात्र भूधारकांचाही या पहिल्या सोडत प्रक्रियेत समावेश करण्यात येणार असल्याची माहिती सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी दिली. (प्रतिनिधी)
 
च्भूसंपादनासाठी संमतीपत्र देणा:या भूधारकांना 22.5 टक्के योजनेअंतर्गत भूखंड मिळण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने सिडकोच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेसाठी अवलंबिण्यात येणा:या कार्यपद्धतीचे पत्रक तयार करण्यात आले असून, ते प्रत्येक गावात वाटण्यात येणार आहे. तसेच या प्रक्रियेसाठी सीबीडी येथे स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात येणार असून, 1 जुलै रोजी त्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
 
च्शासनाने मंजूर केलेल्या सिडकोच्या पुनर्वसन पॅकेजला प्रकल्पबाधित ग्रामस्थांच्या प्रखर विरोधामुळे विमानतळाचा प्रकल्प अडचणीत सापडला होता. मात्र सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया आणि सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी विविध स्तरावर ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांना पुनर्वसन पॅकेजविषयी सविस्तर माहिती दिली. याचा परिणाम म्हणून आज जवळपास बहुतांशी ग्रामस्थांचा विरोध मावळला. त्यामुळे विमानतळाच्या मार्गातील मोठा अडसर दूर झाला आहे.