शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

एपीएमसीत एफएसआय घोटाळा?

By admin | Published: August 29, 2016 5:59 AM

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमधील व्यापाऱ्यांना कमी दराने एफएसआय वाटप केल्याने नुकसान झाल्याची माहिती शासनाने न्यायालयाला दिली आहे.

नामदेव मोरे,  नवी मुंबईमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमधील व्यापाऱ्यांना कमी दराने एफएसआय वाटप केल्याने नुकसान झाल्याची माहिती शासनाने न्यायालयाला दिली आहे. या गैरव्यवहार प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करणार का, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. यामुळे एपीएमसीच्या माजी संचालकांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाजार समितीच्या संचालक मंडळाने मसाला मार्केटमधील व्यापाऱ्यांना शिल्लक एफएसआय देण्याचा निर्णय पाच वर्षांपूर्वी घेतला होता. वास्तविक हा निर्णय घेताना व्यापाऱ्यांकडून किमान रेडिरेकनरप्रमाणे शुल्क आकारणे आवश्यक होते. परंतु प्रत्यक्षात रेडिरेकनरपेक्षा जवळपास ५० टक्के कमी दराने एफएसआय देण्याचा निर्णय घेतला. ६०० रुपये प्रति चौरस मीटर एवढे कमी शुल्क आकारण्यात आले होते. यामुळे या प्रकरणामध्ये घोटाळा झाल्याची तक्रार एक संचालक प्रभू पाटील व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. परंतु त्यावर काहीही कारवाई न केल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यानंतर पणन संचालकपदी नियुक्ती झालेल्या सुभाष माने यांनी एपीएमसीमध्ये एफएसआय घोटाळा झाला असल्याचा ठपका ठेवून संचालक मंडळ बरखास्त केले होते व संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. परंतु हा निर्णय शासनाने रद्द केला होता. एफएसआयचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. २३ आॅगस्टला यावर सुनावणी झाली आहे. शासनाने कमी दराने व्यापाऱ्यांना एफएसआय दिला असल्याचे मान्य केले आहे. यामुळे न्यायालयाने झालेले नुकसान संबंधितांकडून वसूल करून घेणार का, अशी विचारणा केली आहे. यामध्ये एपीएमसीचे नुकसान झाले असल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करणार का, अशी विचारणा केली आहे. याविषयी शासनाला २९ सप्टेंबरपर्यंत म्हणणे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. न्यायालयाच्या या आदेशानंतर शासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. व्यापाऱ्यांकडून अतिरिक्त पैसे वसूल केले जाणार की संचालक मंडळांवर गुन्हे दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यामुळे बाजार समितीमध्ये खळबळ उडाली आहे. राज्यात युतीचे शासन असल्यामुळे कदाचित गुन्हे दाखल केले जातील, असेही बोलले जात आहे. हे प्रकरण न्यायालयात असल्याने त्याविषयी कोणीही अधिकृत प्रतिक्रिया देत नसले तरी मार्केटमध्ये कामगारांपासून अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये याच विषयाची चर्चा सुरू आहे.