शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

गरज असेपर्यंत चारा छावण्या सुरु रहातील - देवेंद्र फडणवीस

By admin | Published: March 04, 2016 6:01 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना बसणारी दुष्काळाची झळ कमी व्हावी यासाठी राज्य सरकारने केलेल्या विविध उपायोजना आणि निर्णयाची शुक्रवारी माहिती दिली.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ४ - राज्याच्या दुष्काळी भागाच्या दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना बसणारी दुष्काळाची झळ कमी व्हावी यासाठी राज्य सरकारने केलेल्या विविध उपायोजना आणि निर्णयाची शुक्रवारी माहिती दिली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच चारा छावण्यास ऑक्टोंबर महिन्यात सुरु झाल्या आणि शेतक-यांना गरज असेपर्यंत त्या सुरु रहातील असे सांगितले. 
 
दोन वर्षात आम्ही शेतक-यांसाठी १८ हजार कोटींची तरतूद केली. मागच्या पंधरावर्षात शेतक-यांसाठी फक्त आठ हजार कोटींची तरतूद झाली होती असे फडणवीस यांनी सांगितले. ज्या गावांमध्ये पाण्याची गरज आहे त्या गावांमध्ये सरकार टॅंकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करत आहे असे फडणवीस यांनी सांगितले. 
 
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पाच लाख लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला. आम्ही ४० कोटी रुपयांचे शिक्षण शुल्क माफ केले ज्याचा १० लाख विद्यार्थ्यांना फायदा झाला असे फडणवीस यांनी सांगितले. शेतक-यांना मोठया प्रमाणावर आर्थिक मदत केल्यानंतर शेतक-यांना शेत तळी देण्याची योजना सरकारने आणली आहे. 
 
मनरेगाच्या माध्यमातून ही योजना कार्यान्वित केली जाईल. तीन दिवसात २४ हजार शेतक-यांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच ज्या शेतक-यांनी पीकविमा घेतलेला नाही, त्यांनापण मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून बाधित शेतक-यांच्या बँक खात्यामध्ये थेट मदत जमा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.