शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

...तरीही जयंत पाटलांना विजयाचा विश्वास; पक्षासाठी विधानपरिषदेत जाणे महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 09:47 IST

अलिबागचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे

अलिबाग - शेतकरी भवनातून राज्याचा मुख्यमंत्री निवडण्याची भाषा करणाऱ्या शेकापचे जयंत पाटील यांना या राजकीय परिस्थितीमुळे विधानपरिषद निवडणूक ही आव्हानात्मक ठरणार अशी चर्चा आहे. उद्धव सेनेच्या मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी अडचणीची ठरणार आहे. मात्र जयंत पाटील यांना आपल्या विजयाची खात्री आहे. विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी महाविकास आघाडीकडून तीन तर महायुतीकडून नऊ आणि अपक्ष दोन असे १४ उमेदवार रिंगणात आहेत.

अलिबागचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पाठिंबा दिला आहे. मात्र ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली आहे. महाविकास आघाडीकडे दोन आमदार निवडून येण्याची ताकद आहे. मात्र तिसऱ्या उमेदवारासाठी कसरत करावी लागणार आहे. 

शेकापची ताकद कमीजयंत पाटील यांनी माझी ही शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर केले आहे. सध्या रायगडात शेकापची ताकद कमी झाली आहे. विधानसभेत त्यांचा एकच आमदार आहे. पक्षाची झालेली ही पिछेहाट रोखण्यासाठी जयंत पाटील यांना विधानपरिषदेत आमदार होणे पक्षाच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीने अति महत्वाचे आहे.  लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांची निवडून आणण्याची जबाबदारी जयंत पाटील यांनी घेतली होती. मात्र त्यांचा करिश्मा चालला नाही. त्यामुळे ठाकरे सेनेत नाराजीचा सूर आहे. 

विधानपरिषद निवडणूक ही महाविकास आघाडीतून लढवत आहे. महाविकास आघाडीने तीन उमेदवार दिले आहेत. तीनही उमेदवार विजयी होणार आहेत. आमच्याकडे ७१ मते असून ६९ मतांची गरज आहे. त्यामुळे आम्ही आमचा कोटा पूर्ण करून तिघांना विजयी करणार.- जयंत पाटील, आमदार, शेकाप

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024Jayant Patilजयंत पाटीलMilind Narvekarमिलिंद नार्वेकरMahavikas Aghadiमहाविकास आघाडी