शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

‘जय जवान’च्या याचिकेला सेनेचे बळ

By admin | Published: August 24, 2016 3:22 AM

प्रताप सरनाईक यांनी ‘जय जवान’ गोविंदा पथकाच्या सर्वोच्च न्यायालयातील जनहित याचिकेला पाठबळ देत हंडीवरील निर्बंध कायदेशीर मार्गाने शिथिल करवून घेण्याची धडपड सुरु ठेवली

ठाणे : नऊ थरांची हंडी आणि ११ लाखांचे बक्षिस लावून न्यायालयीन आदेशांना आव्हान देण्याचा आक्रमक पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला असतानाच शिवसेना आमदार व दहीहंडीचे आयोजक प्रताप सरनाईक यांनी ‘जय जवान’ गोविंदा पथकाच्या सर्वोच्च न्यायालयातील जनहित याचिकेला पाठबळ देत हंडीवरील निर्बंध कायदेशीर मार्गाने शिथिल करवून घेण्याची धडपड सुरु ठेवली आहे. मनसेने ठाण्यात ठिकठिकाणी नऊ थरांच्या हंडीचे फलक लावले आहेत. मनसेने आपली सर्व कुमक ठाण्यातील दहीहंडी यशस्वी करण्याकरिता उतरवली असून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रित केले आहे. त्याचवेळी संस्कृती युवा प्रतिष्ठानचे प्रमुख प्रताप सरनाईक यांनी, बुधवारी जय जवान गोविंदा पथकाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेचा सर्व खर्च करणार असल्याची घोषणा केली. यंदाच्या दहीहंडी उत्सवात कोणत्याही प्रकारची थरांची स्पर्धा करणार नसल्याचे खा. राजन विचारे आणि आ. सरनाईक यांनी स्वतंत्र पत्रकार परिषदेत सांगितले. आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे साजऱ्या करण्यात येणाऱ्या दहीहंडी उत्सवात चार थरांच्यावर थर लावले जाणार नसल्याचे खा. विचारे यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून आमच्या दहीहंडी उत्सवात चार थरांच्यावर थर लावले जात नाहीत. आम्ही जीवघेणी स्पर्धा करीत नाही. हिंदूच्या सणांवरील निर्बंधांना विरोधहिंदुस्थानात हिंदूंचे सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे झाले पाहिजे. राज्य सरकार बाजू मांडण्यात कमी पडले आहे. हिंदूंच्या सणांवर निर्बंध का येतात. एकीकडे या खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिला असताना दुसरीकडे या उत्सवावर आणलेले निर्बंध चुकीचे आहेत. गोविंदांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे ही आयोजकांची जबाबदारी आहे, असे खा. विचारे यांनी सांगितले. संस्कृती युवा प्रतिष्ठान यंदा न्यायालयीन नियमांच्या अधीन राहून व राज्य शासनाच्या क्र ीडा खात्याच्या धोरणानुसार दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे, असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. अत्यंत साधेपणाने हा मराठमोळा उत्सव साजरा करून महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा आम्ही कायम चालू ठेवणार आहोत असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>कान्हाचा १० टक्के नफा जखमी गोविंदांना‘कान्हा’ या आपण प्रदर्शीत केलेल्या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून जो नफा होईल त्यापैकी १० टक्के रक्कम यापूर्वी दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या गोविंदांवरील उपचारासाठी देण्यात येणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.