शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
2
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
3
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
4
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
5
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
6
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
7
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
8
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
9
केंद्र सरकारची कारवाई; 'हिज्ब-उत-तहरीर' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी
10
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
11
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
12
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
13
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
14
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
15
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
16
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
17
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
18
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
19
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
20
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली

राहुल गांधींना माफी मागायला भाग पाडा; वीर सावरकरांच्या नातवाची उद्धव ठाकरेंकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 11:53 AM

विरोधकांच्या बैठकीत शरद पवारांनी सावरकरांबाबत जे मत व्यक्त केले ते स्वागतार्ह आहे असंही रणजित सावरकर म्हणाले.

मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जो अपमान राहुल गांधींनी केला आहे. त्यासाठी त्यांना माफी मागायला भाग पाडा, अन्यथा तुमच्या बोलण्याला काही अर्थ नाही अशी मागणी वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी केली  आहे. राज्यात सुरू असलेल्या सावरकर वादाच्या मुद्द्यावर सावरकर कुटुंबाने स्पष्ट भूमिका मांडली. 

रणजित सावरकर म्हणाले की, सावरकर यांचा वापर राजकीय फायद्यासाठी राहुल गांधींकडून केला जातोय. सावरकर हिंदुत्ववादी विचारांचे होते त्यांच्यावर आरोप केले तर मुस्लिमांची मते मिळतील असा राहुल गांधींचा समज आहे. एका राष्ट्रभक्ताच्या नावाचा अशाप्रकारे उपयोग होणे गंभीर आहे. काँग्रेससोबत असणारे पक्षही सावरकरांचा वापर करतायेत. बाळासाहेबांनी सावरकर स्मारकासाठी जागा उपलब्ध दिली. मणिशंकर अय्यर यांना जोडे मारले परंतु आज त्यांचा वारसा असणारे आज जी भूमिका घेतायेत ते दुर्दैवी आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच सावरकरांचा आदर बाळगणारे लोक आजही काँग्रेसमध्ये आहेत परंतु ते आवाज उचलत नाही. शिवसेनेत फूट पडल्याचे दु:ख आहे. शिवसेना जी बोटचेपी भूमिका घेत होती त्यावर अनेक शिवसैनिक नाराज होते. आज सावरकरांचा अपमान सहन करणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली ती स्वागतार्ह आहे. परंतु ते स्वत: मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या शिदोरी मासिकात अत्यंत आक्षेपार्ह भाषेत सावरकरांवर लिखाण करण्यात आले. यानंतर मी त्यांना पत्र लिहिलं, भेटीची वेळ मागितली. मुख्यमंत्री असताना ते कारवाई करू शकले असते. तेव्हा ती मान्य केली. तुमच्याबाबत सावरकरांबद्दल प्रेम पण कृतीत उतरत नाही तोवर त्याला अर्थ नाही असा टोलाही रणजित सावरकर यांनी लगावला आहे. 

दरम्यान, सावरकरांच्या नावाचा राजकीय फायद्यासाठी दुरुपयोग होत आहे ते दुर्दैवी आहे. जर सावरकरांचा विरोध केला तर भाजपाचा विरोध होईल असा गैरसमज राहुल गांधींचा आहे. मुस्लीमांचे लांगुनचालून करण्याचं राजकारण काँग्रेस करतेय. जो कुणी सावरकरांचा अपमान झाल्यानंतर मैदानात उतरतो त्याला सावरकरवादी मी मानतो. संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्या मनात सावरकरांबद्दल प्रेम असू शकते तसे काँग्रेस नेत्यांच्या मनातही आहे. परंतु ते कृतीत दिसत नाही तोवर त्यांचं बोलणं व्यर्थ आहे. काँग्रेस त्यांच्या भूमिकेपासून दूर होत नाही असं रणजित सावरकर म्हणाले. 

शरद पवारांचे मत स्वागतार्ह विरोधकांच्या बैठकीत शरद पवारांनी सावरकरांबाबत जे मत व्यक्त केले ते स्वागतार्ह आहे. १९८९ मध्ये शरद पवारांनी जे भाषण केले होते ते अतिशय योग्य आहे. सावरकरांचा अपमान करू नका म्हणणं आणि त्यांच्या मित्रांकडून सातत्याने अपमानास्पद बोलणे हे सर्व नुराकुस्ती आहे. सावरकरांचा अपमान झाल्याबद्दल राहुल गांधींवर कारवाई होणे गरजेचे आहे. जर खरोखरच सावरकरांबद्दल आदर असेल तर राहुल गांधींकडून माफी मागायला हवं. सावरकरांनी माफी मागितली हे सिद्ध करणारे एकतरी पत्र दाखवावं असं आव्हान रणजित सावरकरांनी राहुल गांधींना केले. 

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Gandhiराहुल गांधी