शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

वनमंत्री विचारतात, या वाघांना कसे आवरायचे हो?; राज्यातील वाघांची संख्या ३५० पार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 10:03 AM

२७ राज्यांना साकडे, वाढती वाघांची संख्या पाहता त्यांचा मानवाशी होणारा संघर्ष टाळण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करीत आहे.

मनोज मोघेमुंबई : वाघ आणि मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. या वर्षात आतापर्यंत ७७ जणांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. हे रोखण्यासाठी अतिरिक्त वाघांना गुजरात किंवा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठविण्याचा सरकारचा विचार आहे. याआधीची उपाययोजना म्हणून वाघ आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी उपाय सुचवा, असे पत्र वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २७ राज्यांच्या वन व पर्यावरणमंत्र्यांना लिहिले आहे.

व्याघ्रप्रकल्पांतील वाघांची संख्या (२०१८) ताडोबा - ८३, चंद्रपूर - ३१, बह्मपुरी - ३९, चांदा - २३, मेळघाट - ४६, पेंच - ५३, बोर - ६, उमरेड-पवनी-कऱ्हांडला - ११, नवेगाव-नागझिरा - ६, टिपेश्वर - ५, पैनगंगा - १, सह्याद्री - ३

काय म्हणतात वनमंत्री? वाढती वाघांची संख्या पाहता त्यांचा मानवाशी होणारा संघर्ष टाळण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करीत आहे. ‘डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जन वन योजना’ याचसाठी लागू करण्यात आली आहे. याअंतर्गत जंगलांशेजारी वसलेल्या गावांचे वनांवर अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काही गावांचे स्थलांतरही करण्यात आले आहे. त्याचे काही चांगले परिणाम दिसून आले आहेत. अशा प्रकारच्या आणखी कोणत्या योजना आपल्या राज्यांत राबविल्या जातात याची माहिती द्यावी, अशी विनंती वनमंत्र्यांनी अन्य राज्यांकडे केली आहे. 

यामुळे वाढली वाघांची संख्या समृद्ध जंगलांची व्याख्या ही तेथील वाघांच्या संख्येवरून केली जाते. या रुबाबदार प्राण्याचे संवर्धन व्हावे म्हणून महाराष्ट्राने विविध उपाययोजना केल्या. परिणामी राज्यातील वाघांची संख्या ३५० पार पोहोचली आहे. वनांची मर्यादित संख्या आणि वाढणारी वाघांची संख्या याचा ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न वनविभागाकडून केला जात असल्याची बाब मुनगंटीवार यांनी सर्व राज्यांच्या वन व पर्यावरणमंत्र्यांच्या निदर्शनास आणली आहे. 

 

टॅग्स :Tigerवाघ