शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

झाले गेले विसरा, एकत्रितपणे निवडणुकीच्या कामाला लागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 06:14 IST

मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे : भाजपा-शिवसेना आमदारांना दिले आदेश

मुंबई : साडेचार वर्षांत भाजपा शिवसेनेत काहीशी कटुता होती, पण आता ती उगाळत बसण्याचे काहीही कारण नाही. आपण एकत्र आलो आहोत. लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका जिंकण्याचा निर्धार करून एकत्रितपणे फिरा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी आमदारांना दिला.

भाजपा - शिवसेना आमदारांचे स्नेहभोजन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सोमवारी रात्री झाले. मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह भाजपा- शिवसेनेचे बहुतेक मंत्री, आमदार यावेळी उपस्थित होते.

भाजपा शिवसेनेची युती आजची नाही ती पंचवीस वर्षांपासूनची आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी युती होणे अत्यंत आवश्यक होते. युती झाली नसती, तर त्याचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला झाला असता. इतकी वर्षे ज्यांच्या विरोधात आपण रान उठवले त्यांना आपल्या बेकीचा फायदा मिळवून द्यायचा नाही हा विचार करूनच आम्ही एकत्र आलो आहोत. वेगवेगळे लढलो असतो तर आपण पुन्हा पंधरा वर्षे मागे गेलो असतो, असे मुख्यमंत्री आणि उद्धव यांनी सांगितले.

युतीचा निर्णय आता झालेला आहे. भाजपा आणि शिवसेनेच्या नेतृत्वाने एकत्रितपणे बसून हा निर्णय घेतला आहे पण, निवडणुकीच्या मैदानात त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. युती झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूक निश्चितपणे जिंकू असा आत्मविश्वास वाढला आहे.

अगदी काही ठिकाणी थोड्याफार कुरबुरी आहेत पण, लोकसभा निवडणूक लक्षात घेता त्या आता होता कामा नयेत. भाजपा आणि शिवसेनेचे आमदार, स्थानिक नेते या सगळ्यांनी एकत्रितपणे फिरण्यास सुरुवात करा, असे फडणवीस आणि ठाकरे यांनी सांगितले.दोन्ही पक्षांचे आमदार -खासदार, पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी यांच्यात गेली साडेचार वर्षे एकोपा होताच. माझे आणि मुख्यमंत्र्यांचे संबंधही अत्यंत स्नेहाचे राहिले पण, काही मुद्द्यांवर मतभेद होते आणि त्यातून तणावाचे चित्र समोर आले. आता त्यावरदेखील आमच्यात चर्चा होऊन मतभेदाचे मुद्दे मार्गी लागले आहेत. युती झाल्यामुळे तुमचे चेहरेदेखील खुलले आहेत. आता तुम्ही जिल्ह्याजिल्ह्यात एकत्रित बैठका घेऊन युतीची ताकद दाखवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा