शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

‘सीसीटीएनएस’च्या अंमलबजावणीसाठी टास्क फोर्सचे गठन

By admin | Published: March 11, 2017 2:09 AM

विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या चमूवर जबाबदारी.

आशिष गावंडेअकोला, दि. १0- गुन्हा व गुन्हेगारीचा माग काढण्यासाठी 'सीसीटीएनएस' प्रकल्पाच्या माध्यमातून 'मिशन मोड प्रोजेक्ट' देशभरात लागू करण्यात आला असतानाच त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याच्या गृह विभागाने टास्क फोर्स (कृती दल)चे गठन केले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर) व त्यांच्या चमूकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गुन्हा घडल्यानंतर आरोपीचा शोध घेऊन प्रबळ पुराव्यांसह न्यायालयात दोषारोपण सादर करताना पोलीस यंत्रणेचा मोठय़ाप्रमाणात वेळ खर्ची होतो. काही गुन्ह्यांमध्ये वेळीच गुन्हा सिद्ध करणार्‍या पुराव्यांचा शोध अपूर्ण राहतो. त्याचा फायदा न्यायालयात आरोपींना मिळतो. याशिवाय मोबाइल, इंटरनेटच्या गैरवापरातून सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा गुन्ह्यांची नोंद करून त्याचा माग काढताना पोलिसांच्या नाकीनऊ येतात. साहजिकच, सायबर गुन्हे करणार्‍यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. अशा सर्व प्रकारच्या गुन्ह्यांचा तातडीने तपास करण्यासाठी ह्यसीसीटीएनएसह्ण(क्राइम अँन्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँन्ड सिस्टम) हा प्रकल्प देशभरात लागू करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व पोलीस ठाणी, परिक्षेत्र कार्यालये, पोलीस उपायुक्त-सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालये, राज्य गुन्हे अभिलेख केंद्र, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे व पोलीस महासंचालक कार्यालये यांच्यासह देशातील सर्व पोलीस ठाणी व इतर वरिष्ठ कार्यालयांशी जोडली जात आहेत. सीसीटीएनएसची प्रभावी अंमलबजावणी व त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी कृती दल गठित करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. राज्य अग्रेसरसीसीटीएनएस प्रकल्पांतर्गत राज्याच्या पोलीस विभागाने विशेष प्रगती केली आहे. गुन्हे प्रकटीकरण, पुरावा जमा करणे व राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील गुन्हेगारांची माहिती प्रत्येक पोलीस ठाण्यात उपलब्ध करून न्यायालयात अपराध सिद्धतेचे प्रमाण वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. 'आयजीं'च्या चमूकडे जबाबदारीगठित केलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर) असून, त्यांच्या चमूकडे सीसीटीएनएसने जमा केलेला ह्यडाटाह्ण लक्षात घेऊन अँप्लिकेशन्स विकसित करण्याची जबाबदारी आहे. यासाठी हार्डवेअर, मनुष्यबळ उपलब्ध करून देणे व अप्लिकेशन्सची चाचणी करण्याचे काम राज्य गुन्हे अभिलेख केंद्राकडे सोपवले आहेत.