शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मा. संमेलनाध्यक्ष...तुम्ही  चुकत आहात? मतदान टाळून युरोप सहलीवर गेल्याबद्दल ‘नेटीझन्स’नी झोडपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 13:09 IST

‘‘मतदान नाही करणार?? मग लोकशाही वर कस काय बोलणार? ?? का फक्त नौटंकीच करायची...’’ असा सवाल ‘नेटीझन्स’नी देशमुखांना विचारला आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातल्या तीनही टप्प्यांमधले मतदान आटोपणार युरोप सहलीवर जाऊन त्यांनी वैचारीक दुटप्पीपणा दाखवून दिल्याची चर्चा साहित्य वर्तुळात सुरु

पुणे : सोशल मीडियातून, जाहीर भाषणांमधून लोकशाही बद्दलची कळकळ व्यक्त करणाऱ्या, मतदानाबद्दलची आस्था मांडणाऱ्या माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची लोकशाहीबद्दलची तळमळ पोकळ असल्याचे दिसून आले आहे. तरुणांनी मतदान करावे, यासाठी अथकपणे भाषणे ठोकणाऱ्या देशमुखांचे शब्द म्हणजे केवळ ‘बापुडा वारा’ असावा, असे त्यांच्या ताज्या ‘फेसबुक पोस्ट’वरुन स्पष्ट झाले आहे. या ‘तोंडपाटिलकी’ विरुद्ध नेटीझन्सनी देशमुखांना झोडपून काढले आहे. ‘राजा तू चुकत आहेस,’ या शब्दात बडोद्याच्या साहित्य संमेलनातून सरकारला खडे बोल सुनावणारे देशमुख स्वत: मात्र सपत्नीक तीन आठवड्यांच्या युरोप दौऱ्यावर गेले आहेत. यामुळे लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्य, दर पाच वर्षांनी एकदाच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतल्या मतदानाला देशमुख स्वत:च गैरहजर राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

 अर्थात स्वत: मतदानाला दांडी मारणाऱ्या देशमुखांनी अलिकडच्या काही दिवसांमध्ये मतदार जागृतीसाठी भाषणे ‘ठोकून’ आणि लेख ‘पाडून’ अल्प प्रायश्चित घेण्याचाही प्रयत्न बहुधा केला असावा. आपल्या अधिकृत ‘फेसबुक वॉल’वर २६ मार्च रोजी देशमुख लिहितात, ‘‘संविधानावर व तिच्या तत्वज्ञानावर अढळ विश्वास असणारा एक जागरुक भारतीय नागरिक म्हणून केवळ मत देणे एवढेच माझे काम आहे, असे मी मानत नाही तर लोकशाही बळकट होण्यासाठी चांगले उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे, असे मानणारा नागरिक आहे.’’ 
मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन युरोपच्या दिशेने उड्डाण करण्यापुर्वीची छायाचित्रे देशमुख यांनी ९ एप्रिलच्या मध्यरात्री त्यांच्या ‘फेसबुक वॉल’वर प्रसिद्ध केली आहेत. युरोपची सहल तीन आठवड्यांची असल्याचेही त्यांनी यात नमूद केले आहे. त्यामुळे देशमुख ३० एप्रिल रोजी परतणार असल्याचे यावरुन दिसते. तोपर्यंत महाराष्ट्रातल्या तीनही टप्प्यांमधले मतदान आटोपणार आहे. ...............लोका सांगी ब्रह्मज्ञान...लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीकांत देशमुख मतदारांमध्ये जागृती करीत होते. तरुणांचा ‘युवा जाहीरनामा’ त्यांनी नुकताच प्रकाशित केला. त्याहीवेळी त्यांनी मतदान करण्याबाबतचे आग्रही सल्ले युवकांना दिले होते. ............देशमुखांची नौटंकी?यामुळेच ‘‘मतदान नाही करणार?? मग लोकशाही वर कस काय बोलणार? ?? का फक्त नौटंकीच करायची...’’ असा सवाल ‘नेटीझन्स’नी देशमुखांना विचारला आहे. देशमुखांनी ‘निवडणूक आणि मी’ या शीर्षकांतर्गत सहा भागांमध्ये निवडणुकीविषयीची आपली भूमिका, उमेदवारांना दिलेला पाठींबा आणि त्या बद्दलचे विश्लेषण या विषयी ‘फेसबुक’वर लिहिले. अनेक वाचकांनी त्यावर ‘लाईक्स’चे शिक्के मारले. मात्र स्वत: तीन आठवड्यांच्या युरोप सहलीवर जाऊन त्यांनी वैचारीक दुटप्पीपणा दाखवून दिल्याची चर्चा साहित्य वर्तुळात सुरु झाली आहे. ज्येष्ठ भाष्यकार रामदास फुटाणे यांनीही ‘मतदान करुन जाणे योग्य होते,’ अशी अपेक्षा ‘फेसबुक’वर व्यक्त केली आहे.  

टॅग्स :PuneपुणेLaxmikant Deshmukhलक्ष्मीकांत देशमुखliteratureसाहित्यVotingमतदानdemocracyलोकशाहीSocial Mediaसोशल मीडिया