शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

"गेल्या १० वर्षात मी अज्ञातवासात..."; पक्ष सोडताच सूर्यकांता पाटलांचा भाजपावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 15:46 IST

राष्ट्रवादीत मी निवडणूक लढवण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आले असं सांगत सूर्यकांता पाटील यांनी शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश केला. 

मुंबई - गेली १० वर्ष मी स्वत: अज्ञातवासात होते. मोठ्या उत्साहाने भाजपात गेली होती. भाजपा शिस्तीचा आणि न्यायप्रिय पक्ष असल्याचं वाटत होतं. कारण मी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज यांना ओळखत होते. परंतु आता जो पक्ष आहे तो भाजपा नाही. हा वेगळाच आहे. सध्याचा भाजपा व्यापारी, धनाढ्य लोकांचा आणि स्त्रियांना अजिबात महत्त्व न देणारा पक्ष आहे असा गंभीर आरोप माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी केला. नुकत्याच सूर्यकांता पाटील यांनी भाजपाला रामराम केला. त्यानंतर आज शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला.

यावेळी सूर्यकांता पाटील म्हणाल्या की, महिलांना मान देण्याचा कार्यक्रम आम्ही शरद पवारांच्या नेतृत्वात केला. महिलांना न्याय देणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीत काम केले. परंतु आपण आपल्या संस्कारापासून फार दूर आलो असं वाटलं. मी निवडणूक लढवली नाही, काही कमिटी मागितली नाही. काहीही न मागता भाजपात गेली. परंतु गेली १० वर्ष मी आत्मशोधात गेली. आपण जिथे आलो तिथेच गेले पाहिजे असं लक्षात आले. तेव्हा साहेबांशी बोलले, त्यांनी होकार देताच मी क्षणाचा विलंब न लावता पुन्हा स्वगृही परतले असं त्यांनी म्हटलं.

तसेच मी खदखद पक्षाकडे मांडली नाही. मला भाजपाने लोकसभा कबुल केली होती. हिंगोली, नांदेड या मतदारसंघात मी लाखोने निवडून आले होते. परंतु २०१४ आणि २०१९ मला एकही मतदारसंघ दिला नाही. मग कशासाठी थांबायचे, राष्ट्रवादीत मी निवडणूक लढवण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आले. मी ज्या संस्कारात वाढले ते मला तिथे दिसले नाही. लोककल्याणापेक्षा स्वकल्याण करण्यात भाजपा नेतृत्व हरवले आहे. मला स्वकल्याणात रस नाही. ४५ वर्षाच्या राजकारणात मी ते केले नाही असंही सूर्यकांता पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, मी कुठलाही विचार न करता पुन्हा राष्ट्रवादीत परतले आहे. ज्यांना स्वगृही परतायचे आहे त्यांना घ्यायला मी तयार असल्याचं साहेबांनी सांगितले. ज्यांनी लाथाच मारायच्या ठरवल्या त्यांचा विचार साहेब करणार नाही. आम्ही इतर पक्षात गेलो परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी, शरद पवारांबाबत गेल्या १० वर्षात मी एक शब्दही बोलले नाही. हेच भाजपाचे दु:ख होते. शरद पवारांचे घर फोडण्याचा भाजपाचा जो कार्यक्रम होता तो आता संपला आहे. मी अटीशर्थी घालून काम करण्याचं नाटक केले नाही असंही सूर्यकांता पाटील यांनी म्हटलं आहे.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाSharad Pawarशरद पवार