शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

पूर्वी राष्ट्रवादीत तर आता भाजपामध्ये गुंडाराज

By admin | Published: March 07, 2017 9:53 PM

सध्या महाराष्ट्रात खालच्या स्तराचे राजकारण सुरु आहे. कोण जिंकणार हे गृहित धरून काँग्रेस, मनसे किंवा राष्ट्रवादीमधील लोकांना भाजपामध्ये पक्षप्रवेश दिला जात आहे.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 7 : सध्या महाराष्ट्रात खालच्या स्तराचे राजकारण सुरु आहे. कोण जिंकणार हे गृहित धरून काँग्रेस, मनसे किंवा राष्ट्रवादीमधील लोकांना भाजपामध्ये पक्षप्रवेश दिला जात आहे. पूर्वी राष्ट्रवादीमध्ये गुंडाराज होते ते आता भाजपामध्ये सुरु असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या राज्य संयोजिका प्रिती मेनन यांनी जळगावात केला आहे.माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर आरोप केल्याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध मुक्ताईनगर कोर्टात खटला दाखल आहे. या खटल्याच्या कामकाजासाठी त्या मंगळवारी आल्या होत्या. भ्रष्टाचार केवळ मुंबई महापालिकेतच आहे का?शिवसेना व भाजपा हे सत्तेत राहण्यासाठी काही करतात. शिवसेना म्हणते भाजपा भ्रष्टाचारी तर भाजपा म्हणते शिवसेना भ्रष्टाचारी आहे. दोन्ही पक्ष भ्रष्टाचारी आहेत तर शिवसेना व भाजपाची राज्यात व केंद्रात युती कशासाठी आहे. केवळ मुंबई महापालिकेमध्ये भ्रष्टाचार आहे का? राज्यात पारदर्शी कामकाज सुरु आहे का? असा सवाल त्यांनी केला.जिंकण्याची क्षमता असलेल्यांना पक्षप्रवेशमहाराष्ट्रात सध्या खालच्या स्तराचे राजकारण सुरु आहे. निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर करण्यात आले. पिंपरी चिंचवड असो किंवा नाशिक महापालिका या ठिकाणी भाजपाचे नगरसेवक मनसे, राष्ट्रवादी व काँग्रेसमधून आलेले आहेत. कोणत्या उमेदवाराची जिंकण्याची क्षमता आहे ते पाहूनच त्यांना पक्ष प्रवेश दिल्याचा आरोप त्यांनी केला.आधी राष्ट्रवादीचे आता भाजपाचे गुंडाराजनिवडणुका जिंकण्यासाठी मग पप्पू कलाणी असो किंवा त्यांचे नातलग  यासाऱ्यांना पक्ष प्रवेश मिळाला. आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत अरुण गवळी यांच्या कन्येचा फोटा व्हायरल झाला आहे. सर्व गँगस्टर तसेच गुन्हेगारी घटक भाजपामध्ये जमा होत आहेत. पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होते ते आज भाजपामध्ये गुंडाराज आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही चिंतेची बाब आहे.खडसे यांच्या कन्येविरूद्ध गुन्हा दाखल व्हावाजळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेतील एका शाखेत ७३ लाखांच्या जुन्या नोटाबदली केल्याप्रकरणी सीबीआयने बँकेच्या कार्यकारी संचालकांसह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. हे चमत्कारिक आहे. सीबीआयने या कारवाईत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या व जिल्हा बँकेच्या चेअरमन यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. तसेच अन्य शाखांमध्ये काय झाले याची चौकशी कोण करणार ? असा प्रश्न उपस्थित केला.भाजपाचे यश पैसा व बळाच्या आधारेमहाराष्ट्रातील बँकांमध्ये पैसे बदलण्यात आले का? याची देखील चौकशी करावी. जि.प.व नगरपालिका निवडणूक भाजपानेपैसावबळाच्याआधारेजिंकल्याचाआरोपत्यांनीकेला.