शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

अध्यक्षपदासाठी चौरंगी लढत

By admin | Published: October 19, 2016 1:12 AM

उमेदवाराने माघार न घेतल्यामुळे कवी प्रवीण दवणे, समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे, डॉ. मदन कुलकर्णी, डॉ. जयप्रकाश घुमटकर अशी चौरंगी लढत होणार

पुणे : आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून एकाही उमेदवाराने माघार न घेतल्यामुळे कवी प्रवीण दवणे, समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे, डॉ. मदन कुलकर्णी, डॉ. जयप्रकाश घुमटकर अशी चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मतदारांची प्रत्यक्ष भेट, पोस्टाद्वारे आपली भूमिका सांगणारी पत्रे, दूरध्वनीवरून संपर्क याबरोबरच फेसबुक आणि यूट्यूबसारख्या सोशल मीडियाचा वापर करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न संमेलनाध्यक्षपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या उमेदवारांकडून करण्यात येत आहे. नवोदितांना व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच ज्ञानशाखांनाही साहित्यकृतीचा दर्जा देत त्यांच्यासाठी समीक्षेची दालने खुली करण्याची भूमिका उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र संमेलनाध्यक्ष कोण होणार? यासाठी ११ डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. >प्रवीण दवणे : आजकाल भाषेच्याबाबतीत उदासीनतेचे पर्व सुरू झाले आहे. आजकालची मुले भाषाज्ञानाबाबत भांबावलेली दिसतात. पुस्तकांचा खप हा वाचनसंस्कृतीचा पुरावा होऊ शकत नाही. खपलेली पुस्तके कितपत वाचली जातात, हे जाणून घेणे गरजेचे आहे. नवा वाचक निर्माण करायचा असेल तर साहित्यसेवा करण्याची गरज आहे. उमेदीच्या काळात व्यवस्थेत शिरून काम करण्याची गरज आहे. संमेलनाध्यक्षपदाला वेगळा दर्जा आणि वजन असते. त्यामुळे ही संधी घेऊन त्याचे सोने करण्याची माझी इच्छा आहे. सर्वच मतदारांपर्यंत पोहोचू शकेल की नाही, सांगता येत नाही. पण माझे साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचले आहे.>डॉ. जयप्रकाश घुमटकर : खेडोपाड्यात विद्यार्थ्यांना भेटल्यानंतर त्यांच्यात प्रतिभा असल्याचे जाणवते, मात्र त्यांना व्यासपीठ मिळत नाही. त्यांच्या प्रतिभेला नख लावले जात आहे. त्यांना संधी मिळवून देणे, एक साहित्यिक चळवळ निर्माण करून त्यांच्यातील ऊर्जा तेवत ठेवणे यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. आज अनेक सामाजिक विषय आहेत, पण ते अंगावर घेण्याचे धाडस साहित्यिक करीत नाही. मात्र वास्तवादी विषय मांडणारे आणि ज्या साहित्याने समाजाचे प्रबोधन होते असे साहित्य लिहिले गेले पाहिजे. पुण्यापासून धुळे, नाशिक, औरंगाबाद, कर्नाटक, गुलबर्गा आदी विविध भागांतील मतदारांपर्यंत ‘डोअर टू डोअर’ जाऊन भेटणार आहे. >डॉ. अक्षयकुमार काळे : बदलत्या परिस्थितीत मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी अभिरुची, वाचनव्यवहार आणि मराठी संस्कृती यांच्या अस्तित्वाचे आणि संवर्धनाचे प्रश्न जिकिरीचे बनले आहेत. मराठी लेखनव्यवहार, प्रकाशनव्यवहार, मराठी वाचनसंस्कृती यावर सातत्याने पुनर्विचार करून त्यांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांची दिशा ठरविणे आज अपरिहार्य झाले आहे. मराठी समाज, भाषा आणि संस्कृती यांच्या संवर्धनासाठी वचनबद्ध असणाऱ्या वाङ्मय आणि संस्कृती यांचे परस्परसंबंध जाणणाऱ्या क्रियाशील सहृदय रसिकांशी संवाद करून त्यांच्या संवर्धनाच्या योग्य अशा दिशा ठरविता याव्यात, यासाठी मी प्रयत्नशील राहाणार आहे. प्रत्यक्ष गाठीभेटी घेता येणे शक्य नाही. मात्र मतदारांना दूरध्वनी करणे, आपली भूमिका सांगणारी पत्रे पाठविणे तसेच फेसबुक आणि यूट्यूबवरून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणे यावर भर देणार आहे. >डॉ. मदन कुलकर्णी : साहित्याची समीक्षा होणे गरजेचे आहे, मात्र समीक्षात्मक ग्रंथ लिहिण्याचे प्रमाण खूप कमी आहे. अध्ययनात ज्ञानशाखेची आवश्यकता आहे. समाजकारण, अर्थशास्त्र, राजकारण यांसारख्या ज्ञानशाखांचा उपयोग समीक्षेसाठी केला गेला पाहिजे. आज मराठी साहित्य संमेलनात ग्रामीण, दलित आणि आदिवासी किती प्रवाहांना आपण स्थान देतो. त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. या भूमिकेमधून काम करणार आहे. मतदारांपर्यंत वैयक्तिक गाठीभेटीमधून संपर्क साधणे काहीसे अवघड आहे, मात्र माझे साहित्यातले योगदान आणि अध्यक्षपदाची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचविणार आहे. काही मतदारांपर्यंत पत्र पोहोचले आहे.