शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

धरणाच्या पुरात चार युवक वाहून गेले

By admin | Published: July 28, 2014 1:24 AM

जिल्ह्यातील अप्परवर्धा व पूर्णा धरणाने पाण्याची पातळी ओलांडल्याने रविवारी सकाळी या दोन्ही धरणाचे दरवाजे उघडले. धरणाचे पाणी सोडल्याने पूर्णा नदीच्या पुरात तीन युवक आणि वरूड

घाटलाडकीचा संपर्क तुटला : नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले, ११ गावांत पाणी शिरलेअमरावती : जिल्ह्यातील अप्परवर्धा व पूर्णा धरणाने पाण्याची पातळी ओलांडल्याने रविवारी सकाळी या दोन्ही धरणाचे दरवाजे उघडले. धरणाचे पाणी सोडल्याने पूर्णा नदीच्या पुरात तीन युवक आणि वरूड तालुक्यातही एक युवक असे चौघे पुरात वाहून गेले आहेत. तसेच चांदूरबाजार तालुक्यात चारगड प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने या तालुक्यातील सुमारे आठ तर मोर्शी तालुक्यात तीन गावांमध्ये पूराचे पाणी शिरले. या गावांचा संपर्कही तुटला आहे. प्रशासनाने नागरिकांच्या मदतीने बचाव कार्याला प्रारंभ केला आहे.पूर्णा धरणाचे सर्व नऊ दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आल्याने नदी काठच्या ब्राह्मणवाडा थडी, काजळी, देऊरवाडा, चिंचोली, कुरळपूर्णा, पिंप्री, थुगाव आदी गावात पाणी शिरले. तसेच चारगड प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने चारगड नदीला पूर येऊन घाटलाडकी गावातही पाणी शिरले. नदीच्या पुरामुळे या गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच ११ गावे पाण्याखाली आली आहेत. ब्राह्मणवाडा थडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी शिरल्याने या केंद्रातील चार ते पाच कर्मचाऱ्यांनी विद्युत खांबावर चढून आपला बचाव केला. नागरिकांनी त्यांच्या मदतीला धावून त्यांना सुखरूप बाहेर काढले. मात्र गावातील तीन युवक पुरात वाहून गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यातील स्वप्निल वांगे (१७) याचा मृतदेह गावालगतच नदीच्या गाळात दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास आढळून आला. याशिवाय वरुड तालुक्यात तिवसा घाट येथील लंकेश हरिभाऊ तुमडाणे (२०) हा पुरात वाहून गेला. चुडामण नदीच्या पुरात आज रविवारी सहा मजूर अडकल्याची वार्ता पसरल्याने बघ्यांची गर्दी उसळली होती. लंकेश तुमडाणे हाही त्यांच्यात होता. दरम्यान, नदीच्या पुरात तो वाहून गेला. मोर्शी व चांदूरबाजार तालुक्यातील शेतीपीकही पुराच्या पाण्याखाली आले आहे. मोर्शी तालुक्यातून वाहणाऱ्या चारगड नदीच्या पुराचे पाणी खेड, उदखेड व खोपडा गावात शिरले. पुराचे पाणी अनेकांच्या घरात शिरले असून घरांच्या भिंतींची पडझड झाली. (प्रतिनिधी)