शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

खुनातील चौघे २८ वर्षांनी तुरुंगात!

By admin | Published: December 01, 2015 1:01 AM

ब्राह्मणवाडी (तासगाव, ता. सातारा) येथे १९८७ मध्ये झालेल्या एका खुनातील चार आरोपींची तब्बल २८ वर्षांनी सोमवारी तुरुंगात रवानगी झाली. उच्च न्यायालयाने चौघांना जन्मठेप ठोठावली

सातारा : ब्राह्मणवाडी (तासगाव, ता. सातारा) येथे १९८७ मध्ये झालेल्या एका खुनातील चार आरोपींची तब्बल २८ वर्षांनी सोमवारी तुरुंगात रवानगी झाली. उच्च न्यायालयाने चौघांना जन्मठेप ठोठावली असून, ते शरण आल्यानंतरच त्यांच्या अपिलावर सुनावणी करण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर सर्वजण सातारा न्यायालयासमोर शरण आले.लालासाहेब सावंत (रा. ब्राह्मणवाडी) यांचा १९८७ मध्ये जबर मारहाणीत मृत्यू झाला होता. या खटल्यात एकूण सात आरोपी होते. ३ मार्च १९९४ रोजी या सर्वांना जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते. या निर्णयाविरुद्ध सरकार पक्षातर्फे उच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. तेथे एक महिला आरोपी निर्दोष ठरली, तर दोन आरोपींचा मृत्यू झाला. तर, बबन डफळ, प्रकाश सावंत, सुरेश सावंत आणि सुभाष सावंत या चौघांना उच्च न्यायालयाने २५ आॅगस्ट २०१५ रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध त्यांनी न्यायालयात दाद मागितली असून, प्रकरण प्रलंबित आहे.सुनावणीपूर्वी आरोपींनी शरण येणे आवश्यक असल्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्यानुसार सोमवारी हजर झालेल्या चौघांना प्रॉसिक्यूशन स्कॉडचे अविनाश पवार व इतरांनी तिसरे सत्र न्यायाधीश ए. एन. पाटील यांच्यासमोर हजर केले. या चौघांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.