शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

हे तर फसवणूक करणारे सरकार !

By admin | Published: October 30, 2015 1:22 AM

राज्यातील फडणवीस सरकार हे ‘फसवणूक’ सरकार असून जनतेच्या फसवणुकीची वर्षपूर्ती आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली

मुंबई : राज्यातील फडणवीस सरकार हे ‘फसवणूक’ सरकार असून जनतेच्या फसवणुकीची वर्षपूर्ती आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. सत्तेवर आल्यानंतर पहिल्या १० महिन्यांतच या सरकारने राज्यावर ५४ हजार कोटींचे कर्ज लादले. वृत्तपत्रांच्या मथळ्यात राहण्यात धन्यता मानत असलेले हे सरकार, जनतेच्या मनातून सपशेल उतरले आहे, असेही मुंडे म्हणाले.शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील युती सरकारच्या वर्षभरातील कारभारावर टीका केली. सरकारने ३ हजार ७०० कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला. पावसाळी अधिवेशनात १४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. दुष्काळाच्या नावावर पेट्रोल, डिझेलची करवाढ करून १६०० कोटींची अधिकची करवसुली लादली. नदी नियमन धोरण लोकाभिमुख करण्याचे आश्वासन ठरावीक उद्योजकांच्या फायद्यासाठी पहिल्या वर्षीच रद्द केले. रद्द केलेले धोरण पुन्हा लागू करण्याची नामुष्की राष्ट्रीय हरीत लवादाच्या २७ आॅक्टोबरच्या निर्णयामुळे सरकारवर आली, असे मुंडे म्हणाले.सरकारने राज्य कृषिमूल्य आयोगाची नऊ महिन्यांपूर्वी स्थापना केली, परंतु या नऊ महिन्यांत आयोगावर सदस्य नेमले नाहीत की, आयोगाची एकही बैठक झाली नाही. जे सरकार आयोगाचे सदस्य नेमू शकत नाही, ते कृषिमालाला रास्त भाव काय देणार, असा सवालही मुंडे यांनी केला. ‘अच्छे दिन’च येणार सांगून सत्ता मिळवलेल्या सरकारने जनतेला ‘बुरे दिन’ दाखवले आहेत. ‘अब की बार.. भाजप सरकार..’ ही घोषणा ‘अब की बार... डान्स बार’ मध्ये बदलल्याचेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)