शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मराठा विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण, मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:29 IST

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या सहकार्याने विविध २४ अभ्यासक्रमांचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येत्या प्रजासत्ताक दिनापासून या योजनेला सुरुवात होणार असून एकूण २ लाख ८८ हजार तरुण-तरुणींना याचा लाभ मिळणार आहे.

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या सहकार्याने विविध २४ अभ्यासक्रमांचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येत्या प्रजासत्ताक दिनापासून या योजनेला सुरुवात होणार असून एकूण २ लाख ८८ हजार तरुण-तरुणींना याचा लाभ मिळणार आहे. सकल मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने मंगळवारी हा निर्णय घेतला. याशिवाय आर्थिक मागासवर्ग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठीची उत्पन्न मर्यादा सहा लाखांवरून आठ लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात याबाबतची बैठक झाली. या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. राज्यातील कौशल्य विकासासाठी केंद्र सरकारने १८८ कोटींचा निधी दिला आहे. या योजनेतून सुमारे २ लाख ८८ हजार तरुण-तरुणींना विविध २४ अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्य कौशल्य विकास सोसायट्यांच्या माध्यमातून येत्या २६ जानेवारीपासून प्रशिक्षणाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.आॅनलाइन प्रक्रियामराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भातील प्रस्तावांच्या कामांना गती देण्याचे निर्देश देऊन महसूलमंत्री पाटील म्हणाले, स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून दिल्या जाणाºया वैयक्तिक व गट कर्जावरील व्याजमाफी योजनेसाठी प्रजासत्ताक दिनापासून आॅनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.तसेच इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणेच आर्थिक मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा (क्रिमीलेयर) सहा लाखांवरून आठ लाख करण्यासही उपसमितीने मंजुरी दिली. मराठा समाजाला दिल्या जाणाºया विविध सोयीसवलतींसाठीच्या शासन निर्णयातील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या योजनांच्या अंमलबजावणीचा मार्ग सुकर झाल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Mumbaiमुंबई