शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी वाटा, राहुल गांधी नाराज? संजय राऊत म्हणाले, “आम्ही तोलामोलाचे आहोत...”
2
Sushma Andhare : "सत्ताधाऱ्यांकडून बाईपणावर हल्ले, हा विचार मनुवादी..."; सुषमा अंधारे कडाडल्या
3
IND vs NZ : टीम इंडियाला आणखी एक धक्का! सलग दुसऱ्या पराभवाचे सावट; पंतसह विराटही ढेपाळला
4
लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्यास एक कोटी देण्याची घोषणा करणाऱ्याचीच दीड कोटींची सुपारी!
5
Diwali Astro 2024:आजचा शनिवार दिवाळीचा 'बोनस' देणारा; शश राजयोगाचा 'बाराही' राशींना लाभच लाभ!
6
ओलाचा दिवाळी धमाका...! बंगळुरूत शोरुमसमोरच स्कूटर पेटली, नेटकऱ्यांची प्रतिक्रिया...
7
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
8
१०० हून अधिक लढाऊ विमाने... पाच शहरांवर हल्ला... इराणचे किती झाले नुकसान?
9
"पाकिस्तानी लोकांना भारतीय सैन्य दहशतवादी वाटतात कारण..."; साई पल्लवीचं वक्तव्य चर्चेत
10
AUS vs IND, Border Gavaskar Test series : टीम इंडियानं दाखवला या ३ नव्या चेहऱ्यांवर भरवसा
11
Afcons Infrastructure IPOची सुस्त सुरुवात, Hyundai आयपीओ की GMP; गुंतवणूकदारांना कसली भीती?
12
बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म
13
PAK vs ENG : इंग्लंडची दाणादाण, पाकिस्ताननं रचला इतिहास; अखेर शेजाऱ्यांनी मालिका जिंकली
14
धक्कादायक! बनावट ईडीच्या पथकाचा व्यावसायिकाच्या घरावर छापा; वकिलाने आयकार्ड मागताच...
15
मविआ जागावाटपावर राहुल गांधी नाराज असल्याच्या चर्चा; वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...
16
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
17
कारखाना, पक्षांतर अन् बंडखोरी...इंदापुरात कोणते मुद्दे वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी?
18
Yes Bank च्या शेअरमध्ये मोठी घसरण, यामागचं कारण काय? ५ दिवसांत ९ टक्क्यांनी आपटला
19
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
20
'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' सांगणारा 'धर्मवीर २' OTT वर रिलीज! या ठिकाणी घरबसल्या पाहू शकता

भाजीपाल्याची एसटीतून विनाशुल्क वाहतूक

By admin | Published: November 15, 2016 6:32 AM

५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर सर्वसामान्य जनतेला त्याचा मोठा फटका बसत आहे.

मुंबई : ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर सर्वसामान्य जनतेला त्याचा मोठा फटका बसत आहे. यात शेतकरीही होरपळले असून बाजार समित्यांमध्ये स्विकारण्यात येत नसलेल्या नोटा, सुट्या पैशांची चणचण यामुळे शेतकऱ्यांचीही पंचाईत झाली आहे. शेतकऱ्यांची यामधून सुटका व्हावी आणि भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा यासाठी ५0 किलोपर्यंतचा भाजीपाला एसटीतून विनाशुल्क नेण्यास एसटी महामंडळाने मंजुरी दिली आहे. २४ नोव्हेंबरपर्यंत हा निर्णय लागू राहिल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. एसटीतून जास्तीत जास्त प्रत्येक प्रवाशामागे ५0 किलोपर्यंतचा माल वाहून नेला जाऊ शकतो. सध्या ५0 किलोपर्यंतचा माल ५0 किलोमीटरपर्यंत नेण्यासाठी प्रत्येक प्रवाशामागे ६ रुपये आकारण्यात येतात. हा माल नेताना सुट्या पैशांवरुनही वाहक आणि चालकांमध्ये वाद होताना दिसतात. या सर्व कटकटीतून सुटका करण्यासाठी एसटी महामंडळाने ५0 किलोपर्यंतचा कृषीमाल अथवा भाजीपाला वाहून नेण्यासाठी शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय २४ नोव्हेंबरपर्यंत लागू असेल, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. याबाबतचे आदेशच परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते तसेच व्यवस्थापकीय संचालक रणजिंतसिंह देओल यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. ५00 आणि १000 रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबरच्या रात्री घेण्यात आला. या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर चांगलाच परिणाम होऊ लागला. अनेकांकडे नव्या नोटा असल्या तरी सुटे पैसेच नसल्याने दैनदिन खर्च करायचा कसा असा सवाल उपस्थित झाला. त्यामुळे एसटीतून लांबचा तसेच स्थानिक प्रवास करणेही अनेकांनी टाळले. त्याचा परिणाम ऐन दिवाळीत एसटीच्या भारमानावर झाला आणि १0 नोव्हेंबरपासून भारमान घसरल्याने एसटीला मोठा तोटा होऊ लागला.