शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
5
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
6
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
7
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
8
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
9
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
10
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
15
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
16
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
17
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
18
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर

मैत्रीची 'साठी'! राजकारणातील 80 वर्षीय 'तरुणांची' 'दिल-दोस्ती-दुनियादारी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 12:56 IST

नव्वदीच्या उंबरठ्यावर पवारांच्या खांद्याला खांदा लावूल लढले आणि जिंकले

मुंबई : अवघ्या चार महिन्यांत राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झालेल्या उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी जोरदार लढत दिली आणि साताऱ्याची जागा खेचून आणली. उदयनराजेंचा लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये 87,717 एवढ्या मोठ्या फरकाने पराभव झाला. 

लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंचे गेल्या वेळेपेक्षा मताधिक्य निम्म्याने घटले होते. मात्र, भाजपातून पोटनिवडणूक लढविताना त्यांना धक्कादायक पराभव पहावा लागला. खरेतर सातारा ही छत्रपतींची राजगादी. येथे उदयनराजे प्रचंड मताधिक्याने निवडून येत होते. राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी नुकताच भाजप प्रवेश केला होता. लोकसभेच्या सर्वसाधारण निवडणुकीत त्यांच्याविरोधात शिवसेनेने उमेदवार दिला होता. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी लढत दिली होती. मात्र, उदयनराजे भाजपात गेल्याने शिवसेनेने पोटनिवडणुकीपुरती सीट सोडल्याचे सांगितले होते. 

काल लागलेल्या निकालामध्ये उदयनराजेंचा जवऴपास 90 हजार मतांनी पराभव झाला. मात्र, त्यांना आधीच्या निवडणुकांत मिळत असलेले लीड पाहता त्यांच्याविरोधात उभे राहण्यासाठी तुल्यबळ उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादीकडे नव्हता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसमोर हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, त्यांनीही माघार घेत नकार दिला. उदयनराजेंसमोर कोण उमेदवार द्यायचा हा प्रश्न शरद पवारांसमोर उभा होता. पवारांनी त्यांच्याच वयाच्या परममित्राला साद दिली आणि हा माणूस एका पायावर उदयनाराजेंविरोधात लढण्यासाठी तयार झाला.

हा व्यक्ती म्हणजे साताऱ्याचे नवनियुक्त खासदार श्रीनिवास पाटील होय. पाटील हे साताऱ्यातूनच दोनवेळा लोकसभेचे खासदार राहिलेले आहेत. 2004 आणि 2009 ला ते खासदार झाले होते. याशिवाय जवळपास 35 वर्षे भारतीय प्रशासकीय सेवेत काम केले आहे. आघाडीच्या काळात सिक्कीमचे राज्यपालही राहिलेले आहेत. नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाटील यांनी शरद पवारांच्या हाकेला होकार दिला. साताऱ्याचा निकाल फिरवला गेला तो प्रचाराच्या शेवटच्या दिवशी असे बोलले जात आहे. पवार यांनी भर पावसात भाषण केले होते. पण उदयनराजेंविरोधात उभे राहताना पाटील यांनी जय-पराजयाचा विचार केला नव्हता. समोर पराभव दिसत होता. पण त्यांनी सहा दशकांच्या मैत्रीखातर पवारांच्या एका शब्दावर खांद्याला खांदा लावून निवडणूक लढविली आणि जिंकली. राजकारण हरले पण मैत्री जिंकली अशीच भावना दिवसभर सातारकरांच्या मनामध्ये होती.  

मैत्री कधीपासून?

शरद पवार यांनी यावर सांगताना आम्ही दोघे कॉलेजपासूनचे मित्र आहोत. काँग्रेसमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या काळात काम केले. नंतर श्रीनिवास पाटील प्रशासकीय सेवेत गेले. मी मुख्यमंत्री असताना ते अधिकारी होते. सामाजिक बांधिलकीतून काम करत होते. योग्य अंतर ठेवले. सणावाराला मी त्यांच्या घरी जायचो, ते यायचे. यामुळे आमची मैत्री इतकी वर्षे टिकल्याचे रहस्य शरद पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :satara-pcसाताराSharad Pawarशरद पवारShrinivas Patilश्रीनिवास पाटीलUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019