शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

फुरसुंगी, उरुळी देवाची पालिकेच्या हद्दीतून बाहेर नाहीत;  राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

By दीप्ती देशमुख | Updated: August 21, 2023 13:10 IST

अंतिम अधिसूचना कायद्याच्या चौकटीतच घेतली जाईल, अशी हमीही यावेळी सरकारने न्यायालयाला दिली.

मुंबई : पुण्यातील  फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन गावे पुणे महापालिकेतून वगळण्यात आलेली नाहीत. यासंदर्भात अद्याप अंतिम अधिसूचना काढण्यात आलेली नाही, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. अंतिम अधिसूचना कायद्याच्या चौकटीतच घेतली जाईल, अशी हमीही यावेळी सरकारने न्यायालयाला दिली. फुरसुंगी व उरुळी देवाची, ही दोन गावे पुणे महापालिकेच्या हद्दीतून वगळण्याच्या राज्य सरकारच्या मार्च २०२३ च्या निर्णयाला रणजीत रासकर व अन्य काही जणांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे होती.महापालिकेचा कार्यकाळ  फेब्रुवारी २०२२मध्ये संपुष्टात आल्याने पालिकेवर आयुक्तांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि गावे वगळण्याचा निर्णय त्यांच्याशी सल्लामसलत करून घेण्यात आला आहे. कायद्यानुसार,  पालिकेच्या महासभेशी सल्लामसलत केल्याशिवाय सरकार हा निर्णय घेऊ शकत नाही. प्रशासकाबरोबर केलेली सल्लामसलत ही कायद्याला अभिप्रेत असलेली 'सल्लामसलत' नाही, असा युक्तिवाद याचिकादारांचे वकील प्रल्हाद परांजपे व अॅड. मनिष केळकर यांनी केला.

मात्र, राज्याचे महाअधिवक्ते बीरेंद्र सराफ यांनी राज्य सरकारने गावे वगळण्याबाबत सरकारने अंतिम अधिसूचना काढली नसल्याची माहिती खंडपीठाला दिली. तसेच महाराष्ट्र महापालिका अधिनियम, कलम 452 (ए) अंतर्गत प्रशासक   पालिकेसंबंधीत सर्व निर्णय घेऊ शकतो. 'अद्याप अंतिम अधिसूचना काढण्यात आलेली नाही. ती जारी करण्यापूर्वी सर्व कायदेशीर प्रक्रियांची पूर्तता करू. आवश्यकता भासल्यास याचिकदारांना सुनावणी देऊ,' अशी हमी सराफ यांनी न्यायालयाला दिली. त्यांच्या या विधानानंतर न्यायालयाने याचिका निकाली काढली. तसेच याचिकदारांना 10 दिवसांत पालिकेकडे निवेदन सादर करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबईPuneपुणे