शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

कोकणासह गडचिरोलीत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:07 AM

राज्यात मंगळवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोकण, गोव्यासह विदर्भातील गडचिरोली तालुक्यात अतिवृष्टी झाली. कोकणातील नद्यांना पूर आल्याने

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/पुणे : राज्यात मंगळवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोकण, गोव्यासह विदर्भातील गडचिरोली तालुक्यात अतिवृष्टी झाली. कोकणातील नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. मराठवाड्यातही पाऊस सक्रिय झाला असून परभणीत जोरदार सरी बरसल्या. जालना, बीड, हिंगोली, लातूरसह औरंगाबाद शहरातही रिमझिम पाऊस झाला.पावसाने पश्चिम महाराष्ट्राही सुखावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस होता. गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, भुदरगड, आजरा व चंदगड तालुक्यांना पावसाने झोडपून काढले असून नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यंदा पहिल्यांदाच पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. राधानगरी धरणातून विसर्ग वाढविण्यात आला असून, वीजनिर्मितीसाठी प्रतिसेकंद १२०० घनफूट पाणी सोडले जात असल्याने नद्यांची पातळी वाढली आहे. पंचगंगा, भोगावती व कासारी नद्यांवरील अकरा बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सांगली जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. पलूस, कडेगाव तासगाव तालुक्यातील पिकांना यामुळे जीवदान मिळाले आहे. चांदोली पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असून गेल्या २४ तासात पाणीसाठा एक टीएमसीने वाढला आहे. सातारा जिल्ह्यातही सर्वदूर दमदार पाऊस पडत आहे. कोयना धरण पाणलोेट क्षेत्रात चार दिवसांपासून संततधार कायम आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढल्याने पाणीसाठ्यात चोवीस तासांत चार टीएमसीने वाढ झाली. त्यामुळे धरणात सध्या ५२.३६ पाणीसाठा झाला आहे. कोकणात धुमशान कोकणात अक्षरक्ष: पावसाचे धुमशान सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून सोमवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. नारिंगी आणि जगबुडी नदीला पूर आला असून दुपारी खेड आणि संगमेश्वर बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात मध्यरात्री जोरदार वादळ झाले. रत्नागिरी परिसरालाही पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडत आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात सोमवारी रात्रीपासून जोरदार बरसणाऱ्या पावसाने आंबेरी, दुकानवाड, पुळास येथील पुलावर पाणी आले असून, खोऱ्यातील तब्बल २७ गावांचा पूर्णत: संपर्क तुटला आहे. या परिसरातील शाळाही लवकर सोडून देण्यात आल्या. रात्री एस.टी. वाहतूक पूर्णत: ठप्प झाली असून, अनेक प्रवाशी दुकानवाड, शिवापूर तसेच अन्य गावात अडकून पडले आहेत. उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठेमध्ये पावसाचे पाणी दुकानात शिरल्याने एकच तारांबळ उडाली आहे. रायगड जिल्ह्यातही संततधार पाऊस झाला. अंबा, सावित्री, कुंडलिका नद्यांची जलपातळी सोमवारी सायंकाळी पूर रेषेजवळ पोहोचल्याने नदी किनाऱ्याच्या सुमारे २४५ गावांतील ग्रामस्थांनी रात्र जागूनच काढली. मात्र पहाटेच्या सुमारास पाणी ओसरू लागल्याने पुराचा धोका टळला आहे. कोकण रेल्वेमार्गावरची वाहतूक सुरळीत सुरू होती. नागपूरात हजेरी, गडचिरोलीत अतिवृष्टीविदर्भातही पाऊस सक्रिय असून नागपूर शहरात तब्बल पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर धो-धो पाऊस बरसला. गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाली़धरणांमधील साठा वाढलाधरण क्षेत्रात संततधार सुरु असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील धरणामधील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे़ भिमा खोऱ्यातील २५ पैकी ६ धरणांमधील पाणीसाठा ८० टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे़ मावळमधील पडत असलेल्या पावसाने आंध्रा धरण एकाच दिवसात ९९़५५ टक्के भरले आहे़ चासकमान धरण ८०़५१ टक्के भरले असून धरणातून नदीपात्रात ३०० क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे़ येडगाव ८१़४८ टक्के, कळमोडी १०० टक्के, कासारसाई ८७़६७ टक्के धरले आहे़ पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतरअतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात झाल्याने महाराष्ट्रात आणखी ३ दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे़