शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

प्रवाशांच्या जिवाशी खेळ!

By admin | Published: April 27, 2016 6:27 AM

एसटी महामंडळ ‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ असल्याचा दावा करते. मात्र हा प्रवास आता कितपत सुरक्षित राहिला आहे हा मोठा प्रश्नच गेल्या चार महिन्यात निर्माण झाला आहे.

मुंबई : ‘सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी’, असे ब्रीदवाक्य असणारे एसटी महामंडळ ‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ असल्याचा दावा करते. मात्र हा प्रवास आता कितपत सुरक्षित राहिला आहे हा मोठा प्रश्नच गेल्या चार महिन्यात निर्माण झाला आहे. गेल्या चार महिन्यात एसटीच्या बस गाड्यांना आग लागल्याचा पाच घटना घडल्या आहेत. या घटनांची दखल घेत परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी संबंधित बस असलेल्या टाटा कंपनीकडून अहवाल मागितला आहे. सोमवारी मुंबई-गोवा महामार्गावर सकाळी नऊच्या सुमारास एसटी महामंडळाच्या मुरुड-मुंबई बसने चिंचवण येथे पेट घेतल्याची घटना घडली. बस चालकाने प्रसंगावधान राखून बस बाजूला उभी केली आणि त्वरीत ५४ प्रवाशांना उतरविले. इंजिनमधील शॉटसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता एसटीच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. ही घटना घडण्यापूर्वी जानेवारी महिन्यापासून ते आतापर्यंत एसटी बस गाड्यांना आग लागल्याच्या चार घटना घडल्या आणि सोमवारी घडलेली ही पाचवी घटना आहे. वाडा त्यानंतर ठाणे शहर, मराठवाड्यात भूम येथे, खंडाळा घाटात आणि आता चिंचवण येथे एसटी बस गाड्यांना आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटनेत बसमध्ये प्रवासी होते आणि चालक-वाहकाच्या प्रसंगावधनामुळे प्रवाशांचा जीव वाचला आहे. याबाबत एसटीतील सूत्रांनी सांगितले की,घडलेल्या पाच घटनांमध्ये तीन सेमी लक्झरी आणि दोन साध्या बसचा समावेश आहे. या सर्व बसची बॉडी एसटी महामंडळाकडून बांधण्यात आली आहे. मात्र बसमधील इंजिन आणि अन्य इलेक्ट्रीकल कामे टाटा कंपनीची आहेत. त्यांच्याकडूनच होणाऱ्या कामांत काही चुका होत आहेत की अन्य काही कारणे आहेत याची माहीती एसटी महामंडळाकडून घेतली जात >सातत्याने घडणाऱ्या आगीच्या घटनांची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. टाटा कंपनीला यासंदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे आणि त्वरीत अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांनी अहवाल सादर करताच पुढील निर्णय घेण्यात येईल.- दिवाकर रावते (परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष)