शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

‘सफाई’मध्ये गांधी-आंबेडकरवादाचा समन्वय!

By admin | Published: May 16, 2016 2:49 AM

द्ध मार्क्सवाद, शुद्ध स्त्रीवाद यांचीही सूत्रे आपल्याला सफाईत सापडतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

मुंबई : महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला भारत एकच आहे. हा भारत हिंदू नाही, तर सेक्युलर असावा, अशीच या दोघांची धारणा होती. सुमेध वडावाला रिसबूड यांच्या सफाई कादंबरीत गांधी आणि आंबेडकरांना अपेक्षित असलेली जातीपलीकडे जाण्याची भूमिका ठामपणे मांडली आहे. इतकेच नव्हे, शुद्ध मार्क्सवाद, शुद्ध स्त्रीवाद यांचीही सूत्रे आपल्याला सफाईत सापडतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.हिताय फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्त ‘सफाई’ कादंबरीच्या लेखनासाठी ज्येष्ठ साहित्यिक सुमेध वडावाला रिसबूड यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता साहित्य पुरस्कारदेखील या वेळी प्रदान करण्यात आला. त्या वेळी सबनीस बोलत होते. या प्रसंगी साहित्यिक सुमेध वडावाला-रिसबूड, ‘लोकमत’चे फोटो एडिटर सुधारक ओलवे, पालिकेतील सर्वाधिक शिकलेले सफाई कर्मचारी (एम.फिल) सुनील यादव, तसेच हिताय फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंतकुमार कांबळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पंतप्रधान मोंदींनी केवळ एक दिवस हातात झाडू घेऊन काहीही होणार नाही, तर संपूर्ण यांत्रिकीकरणाद्वारे आता सफाईची कामे व्हायला हवीत. एका विशिष्ट समाजाने आता आणखी किती वर्षे सफाई करायची, अन्यथा सवर्णांनीच यापुढे सफाईची कामे करावीत, असे परखड मतही डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.एमफिल पदवी संपादन केल्यानंतरही दररोज हातात झाडू घेऊन सफाई काम करणारे पालिका कर्मचारी सुनील यादव यांनीही या वेळी आपली मते व्यक्त केली. ‘हिताय फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंतकुमार कांबळे यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यात सुमेध वडावाला रिसबूड यांना डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर समता साहित्य पुरस्कार, मानपत्र, शाल-श्रीफळ व रोख पन्नास हजार रुपये देण्यात आले. (प्रतिनिधी)