शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गांधीगिरी : जालन्यात खराब सोयाबीन-कपाशीचे बुके देऊन केले अधिकाऱ्यांचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 17:56 IST

मराठा महासंघाच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी पिकाची पाहणी करण्यासाठी गावात आलेल्या अधिकाऱ्यांचे खराब झालेले सोयाबीन आणि कपाशीच्या झाडांचे बुके देऊन स्वागत केले. तसेच लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली.

जालना - राज्यभरात परतीच्या पावसाने कहर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या परिस्थितीत शेतकरी पुन्हा आर्थिक विवंचनेत सापडला असून सरकारने लवकरात लवकर मदत द्यावी अशी अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र शासन आणि प्रशासन कागदी घोडे नाचवण्यातच वेळ घालवत असल्याचा आरोप करत मराठा महासंघाने आक्रमक पावित्रा घेतला आहे.

जालना जिल्ह्यातील कारला गावात मंगळवारी तलाठी आणि कृषीअधिकारी नुकसानग्रस्त भागातील पिकांचा पंचनामा करण्यासाठी आले होते. त्यावेळी मराठा महासंघाच्या वतीने अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांना थेट मदत करण्याची मागणी करण्यात आली. तसेच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा छळ थांबवून कागदीघोडे नाचवणे बंद करावे अशी मागणी मराठा महासंघाच्या विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष  शैलेश देशमुख यांनी केली. 

दरम्यान मराठा महासंघाच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी पिकाची पाहणी करण्यासाठी गावात आलेल्या अधिकाऱ्यांचे खराब झालेले सोयाबीन आणि कपाशीच्या झाडांचे बुके देऊन स्वागत केले. तसेच लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली. यावेळी पंचायत समिती सदस्य रामराव काळे, माजी सरपंच एकनाथ खरात, नवनाथ सरोदे आदी उपस्थित होते.