शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

कचरा समस्या पेटणार!

By admin | Published: August 06, 2014 11:30 PM

शहरातील कचरा उरूळी देवाची येथील कचराडेपोत टाकला जात असला, तरी महापालिकेने या ठिकाणच्या ग्रामस्थांना मूलभूत सुविधा देण्यासाठी कोटय़वधींचा खर्च केला आहे.

पुणो : शहरातील कचरा उरूळी देवाची येथील कचराडेपोत टाकला जात असला, तरी महापालिकेने या ठिकाणच्या ग्रामस्थांना मूलभूत सुविधा देण्यासाठी कोटय़वधींचा खर्च केला आहे. मात्र, त्यानंतरही ग्रामस्थ वारंवार आंदोलन करीत असल्याने पालिका प्रशासनाने पोलीस आयुक्तांशी चर्चा करून हे आंदोलन मार्गी लावावे, असे आदेश महापालिकेतील पक्षनेत्यांनी आज (बुधवार) पालिका प्रशासनास दिले. 
 
वेळ पडल्यास या गावांना दिले जाणारे पाणी आणि त्या ठिकाणच्या मुलांना देण्यात आलेल्या नोक:यांबाबतही विचार करण्याची वेळ आली असल्याची भूमिका या बैठकीत पक्षनेत्यांनी घेतली असल्याची माहिती सूत्रंनी दिली. 
त्यामुळे महापालिकेने आंदोलनाबाबत ताठर भूमिका घेतल्यास कचरा 
आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वारंवार सूचना देऊनही महापालिकेकडून उरुळी देवाची येथील कचरा डेपोच्या ठिकाणी ओपन डंपिंग सुरू आहे. तसेच महापालिकेकडून शहराच्या चारही दिशांना कचरा डेपो सुरू करण्याचे आश्वासन देऊनही त्याबाबत 
काहीच हालचाल केली जात नाही. त्यामुळे फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील ग्रामस्थांनी आजपासून डेपोवर येणा:या शहरातील कचरागाडय़ा अडविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परिणामी शहरात कच:याचे ढीग साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच पावसाळा सुरू असल्याने शहरात आरोग्याचा गंभीर प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर आज पक्षनेत्यांची बैठक झाली. 
या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी या आंदोलनाबाबत तीव नाराजी व्यक्त केली. कचरा समस्या सोडविण्यासाठी प्रशासन विविध स्तरांवर प्रयत्न करीत आहे. असे असतानाही, ग्रामस्थ वारंवार आंदोलन करून महापालिकेने विविध मागण्या करीत आहेत. 
ही बाब चुकीची असल्याने त्यावर प्रशासनाने आता गांभीर्याने विचार करावा, अशा सूचना या बैठकीस 
उपस्थित असलेल्या प्रशासनाच्या अधिका:यांना देण्यात आल्या. 
ही समस्या सोडविण्यासाठीचे सर्व अधिकार पक्षनेत्यांनी आयुक्तांना दिले असल्याने वेळप्रसंगी प्रशासनाने पोलीस आयुक्तांशी चर्चा करून या आंदोलनाबाबत मार्ग काढावा तसेच वेळ पडल्यास पोलीस बंदोबस्तात कचरा न्यावा, असे आदेश देण्यात आल्याचे सूत्रंनी स्पष्ट केले आहे. 
                                (प्रतिनिधी) 
 
4पक्षनेत्यांच्या या भूमिकेबाबत महापौर चंचला कोद्रे यांनी बोलण्यास नकार दिला. अशी मागणी झाली असली, तरी त्याची गरज पडणार नसल्याचे कोद्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच या आंदोलनाबाबत ग्रामस्थांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल. त्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे कोद्रे यांनी स्पष्ट केले. मात्र, सध्या निर्माण झालेली कचराकोंडी सोडविण्याबाबत काय उपाय करणार याबाबत कोद्रे यांना काहीच सांगता आले नाही.
 
..तर पोलीस बंदोबस्त
पुणो : पक्षनेत्यांची बैठक होताच महापालिका प्रशासनाकडून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रात्री उशिरार्पयत बैठकांचे सत्र सुरू होते. या बैठकीनंतर उरुळी येथील कचरा डेपोच्या ठिकाणी कचरा कँपिंगसाठी घेऊन जाण्यास पोलीस आयुक्तांशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीचे पत्र पोलीस आयुक्तांना देण्यात येणार आहे. तसेच वेळ पडल्यास तत्काळ पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येणार आहे. 
उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी बुधवारपासून कचरा बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्याचे अधिकार महापौरांसह सर्वपक्षीय नेत्यांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत. तसेच आज झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत वेळ पडल्यास पोलीस बंदोबस्तात कचरा टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. पक्षनेत्यांच्या या बैठकीनंतर प्रभारी आयुक्तपदाचा पदभार असलेल्या अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी प्रशासनाच्या अधिका:यांची बैठक घेतली. या बैठकीत आजच्या दिवसभराच्या स्थितीचा आढावा त्यांनी घेतला. पर्यायी उपाययोजनांची चाचपणी करण्यात आल्याची माहिती सूत्रंनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या पत्रनुसार, शहरातील निर्माण होणारी कचरा समस्या लक्षात घेऊन संबंधितांना बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्याबाबत विनंती करण्यात येणार असल्याचे सूत्रंनी स्पष्ट केले.
 
4या बैठकीत शहरातील सर्व कच:यावर प्रक्रिया करणो शक्य नसल्याने काही कचरा डेपोमध्ये कँपिंगसाठी घेऊन जाण्यावरही चर्चा करण्यात आली. मात्र, त्यास ग्रामस्थांचा विरोध असल्याने गरज पडल्यास पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून घेण्याबाबतही चर्चा करण्यात आली. त्यानंतर तत्काळ पोलीस आयुक्तांना पत्र पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.