शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

आदिवासींसाठी नवे कायदे आणणार, राहुल गांधी यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 12:06 PM

भारत जोडो पदयात्रेत आदिवासी कष्टकरी महिलांचा मेळावा..

जयदेव वानखडे -

जळगाव जामोद (जि. बुलढाणा) : आदिवासींचे पर्यावरणाशी अतिशय जुने नाते आहे. त्यांची भाषा जगण्याची पद्धत वेगळी असली तरी इतरांपेक्षा कमी नाही. यूपीए सरकारने आदिवासींना वन जमिनीचा अधिकार दिला तो त्यांचा हक्क आहे, आमचे सरकार आल्यावर त्यांच्यासाठीचे कायदे दुपटीने मजबूत करून  आदिवासींसाठी नवे कायदे आणणार असल्याचे आश्वासन प्रतिपादन खासदार राहुल गांधी यांनी दिले. भारत जोडो पदयात्रा रविवारी जळगाव जामोद येथे पाेहाेचली़  यावेळी  येथे लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने आदिवासी कष्टकरी महिलांचा मेळावा घेण्यात आला. महिला मेळाव्याला संबाेधित करताना त्यांनी महिलांना ३० टक्के आरक्षण दिले असून, मनरेगाच्या माध्यमातून कामाची हमी दिली असल्याचे सांगितले. भारत जोडो यात्रेचे लक्ष देश जोडणे आहे, हिंसा अन्याय याविरुद्ध लढण्यासाठी आम्ही निघालो आहोत. सध्या देशात महिला असुरक्षित आहेत. जो देश महिलांचा सन्मान करत नाही तो पुढे जाऊ शकत नाही. बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत़  महिला जातीचा अपमान हाेताना दिसत असल्याची त्यांनी चिंता व्यक्त केली.

‘आमच्यासाठी तुम्ही आदिवासी...’ माझी आजी स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी मी लहान असताना मला एक पुस्तक वाचायला दिले त्याचे नाव होते ‘तेंदू एक आदिवासी बच्चा’.

ते पुस्तक मला खूप आवडायचे़  मी माझ्या आजीकडून ते ऐकायचो.  मोठा झाल्यावर मला एका प्रदर्शनामध्ये ते पुस्तक पाहायला मिळाले . या भारत भूमीवर पहिला अधिकार आदिवासींचा आहे. तेच जंगलाचे मालक आहेत. परंतु त्यांना वनवासी संबाेधले जात आहे. 

कोणताही वनवासी शहरात राहून डॉक्टर, इंजिनिअर होऊ शकणार नाही का? असा प्रश्न उपस्थित करत आमच्यासाठी तुम्ही वनवासी नाही तर आदिवासीच आहात असा विश्वासही राहुल गांधी यांनी या आदिवासी मेळाव्यातून दिला. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या जिलाबाई वसावा, बेनुबाई पाडवी, नंदा पावरा, यशोमती ठाकूर, डॉ. स्वाती वाकेकर, अंजली टापरे, ज्योती ढोकणे, हेमप्रभादेवी, प्रेमलता सोनोने मंचावर उपस्थित होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राWomenमहिला