शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

परळी औष्णिक केंद्रात आॅईलद्वारे वीज निर्मिती

By admin | Published: March 05, 2016 4:07 AM

तालुक्यातील दाऊतपुर शिवारात महाराष्ट्र राज्य विजनिर्मिती कंपनीने दोन हजार कोटी रुपये खर्चून उभारलेल्या २५० मेगा वॅट क्षमतेच्या संच क्रमांक ८ मधून शुक्रवारी आॅईलद्वारे वीज निर्मिती करण्यात आली.

परळी (बीड) : तालुक्यातील दाऊतपुर शिवारात महाराष्ट्र राज्य विजनिर्मिती कंपनीने दोन हजार कोटी रुपये खर्चून उभारलेल्या २५० मेगा वॅट क्षमतेच्या संच क्रमांक ८ मधून शुक्रवारी आॅईलद्वारे वीज निर्मिती करण्यात आली. पाण्याअभावी संथ झालेल्या विद्युतनिर्मिती केंद्राच्या कामाला यामुळे नवीन गती मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनीचे (प्रकल्प) कार्यकारी संचालक अनिल नंदनवार, एस.डी. देवतारे, परळीचे मुख्य अभियंता खटारे, उपमुख्य अभियंता डी.आर. मुंडे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या नविन संचातून पहिल्यांदाच १५ मे.वॅ. एवढी विजनिर्मिती झाली. संच क्र. ८ हा वीज निर्मितीसाठी सज्ज झाला आहे. पाण्याचा प्रश्न असल्याने हा संच चालू करुन बंद करुन ठेवला आहे. १५ दिवसानंतर २५० मे.वॅ. ऐवढ्या पूर्ण क्षमतेने हा संच तीन दिवस चालविण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.पाण्याअभावी गेल्या पाच महिन्यापासून परळी औष्णिक विद्युत केंद्रातील पाच संच बंद ठेवण्यात आले आहेत. संच क्र. ३, ४, ५ व ६,७ हे पाच संच परळी औष्णिक केंद्रात आहेत. जुन्या परळी औष्णिक विद्युत केंद्रात २१० मे.वॅ. क्षमतेचे तीन संच तर नविन परळी औष्णिक विद्युत केंद्रात २ संच आहेत. या पाच संचाची स्थापीत क्षमता ११३० मे.वॅ. एवढी आहे. त्यात आता नविन संच क्र. ८ ची २५० मे.वॅ. ने भर पडणार आहे. (प्रतिनिधी)