शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

जीओ टॅगिंगची यंत्रणा यशस्वी

By admin | Published: April 26, 2016 4:17 AM

महानगरपालिकेच्या कामांमध्ये पारदर्शकता यावी, कामांची पुनरावृत्ती टाळावी आणि सुरू असलेल्या कामांची स्थिती काय आहे

ठाणे : महानगरपालिकेच्या कामांमध्ये पारदर्शकता यावी, कामांची पुनरावृत्ती टाळावी आणि सुरू असलेल्या कामांची स्थिती काय आहे, ते कोणत्या टप्प्यावर आहे, याची अद्ययावत माहिती मिळावी, यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी देशात सर्वप्रथम जीओ टॅगिंग यंत्रणा राबवण्याचा मान मिळवला होता. ही यंत्रणा यशस्वी झाल्याचा दावा आता पालिकेने केला आहे. विशेष म्हणजे इतर शासकीय यंत्रणाही जीओ टॅग यंत्रणा वापरण्याविषयी सकारात्मक विचार करीत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. याबाबत, अलीकडेच केंद्र सरकारच्या मनुष्यबळ मंत्रालयानेही हे तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आयुक्तांनी जीओ टॅगिंगचा घेतलेला निर्णय आता अनेक शासकीय यंत्रणा राबवण्याचा विचार करीत असल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी करोडो रुपयांची विकासकामे करण्यात येतात. या कामांचे योग्य मूल्यमापन व्हावे, कामांमध्ये पारदर्शकता राहावी, कामांची काय प्रगती आहे, त्याचत्याच कामांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रत्येक कामाचे जीओ टॅगिंग झाल्याशिवाय त्याचे देयक अदा करू नये, असे आदेश काढले होते. यावरून, लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला स्थायी समिती आणि महासभेत चांगलेच धारेवर धरले होते. (प्रतिनिधी)