शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

सकारात्मक ऊर्जा मिळवा

By admin | Published: February 12, 2017 12:31 AM

नीला सत्यनारायण : आंतरभारती शिक्षण मंडळातर्फे कांचन परुळेकर यांना ‘कुुसुम पुरस्कार’

कोल्हापूर : प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी आणि दु:खे असतात. त्यामुळे हे सगळं माझ्यासोबत का घडतंय असा विचार न करता घडत असलेल्या नकारात्मक गोष्टींतून सकारात्मक ऊर्जा मिळवा, चौकटीबाहेर जाऊन प्रश्नांचा विचार करा. त्यातूनच उत्तरं मिळत जातात. जगण्याचा दृष्टिकोन बदलतो, असा कानमंत्र माजी राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी महिलांना दिला. शाहू स्मारक भवन येथे शनिवारी आंतरभारती शिक्षण मंडळाच्यावतीने कांचन परुळेकर यांना ‘कुसुम पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सुचेता कोरगावकर होत्या. रोख रुपये २५ हजार, शाल, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. व्यासपीठावर सुचेता पडळकर, विनय पाटगावकर, पल्लवी कोरगावकर, तनुजा शिपूरकर, एम. एस. पाटोळे उपस्थित होते. नीला सत्यनारायण यांनी आपल्या कथांच्या माध्यमातून उपस्थित महिलांना जगण्याचा मूलमंत्र दिला. त्या म्हणाल्या, गृहिणी असलेल्या महिलांना बऱ्याच वेळा न्यूनगंड असतो. मात्र, स्त्रीने कुटुंबाचा सांभाळ करण्यास नकार दिला तर कुटुंब विस्कळीत होते. कांचन परुळेकर म्हणाल्या, महिलांना चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर काढून त्यांच्या शक्तीचा वापर कुटुंबाच्या, समाजाच्या कल्याणासाठी करीत ‘स्वयंसिद्धा’ने त्यांना आत्मनिर्भर केले आहे. महिलांना राजकारणात आरक्षण मिळाले असले तरी ‘वहिनीसाहेबां’च्या वतीने ‘साहेब’च कारभार करतात. त्यामुळे महिलांना राजकीयदृष्ट्या साक्षर करणे गरजेचे आहे. सुचेता कोरगावकर यांनी समारोप केला. तनुजा शिपूरकर यांनी प्रास्ताविक, इंद्रायणी पाटील यांनी सूत्रसंचालन, तर एम. एस. पाटोळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे शनिवारी नीला सत्यनारायण यांच्या हस्ते कांचन परुळेकर यांना ‘कुसुम पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी सुचेता पडळकर, विनय पाटगावकर, सुचेता कोरगावकर, पल्लवी कोरगावकर, तनुजा शिपूरकर, एम. एस. पाटोळे उपस्थित होते.